… तर सत्य बाहेर येईल, ‘त्या’ प्रकरणात सुप्रिया सुळेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

Supriya Sule On Election Commsion : गेल्या काही दिवसांपासून लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणूक आयोगावर (Election Commsion) हल्लाबोल करताना दिसत आहे. नुकतंच राहुल गांधी यांनी एक्स वर पोस्ट करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मतदारसंघात मतदार यादीत 5 महिन्यात 8% वाढ झाली. काही बुथवर 20 ते 50 टक्क्यांनी मतदार वाढले. असा आरोप केला आहे. यावर आता निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना चर्चेसाठी आवाहन केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जर निवडणूक आयोगाने चर्चेसाठी बोलावले असेल तर जायला पाहिजे. शेवटी एका सशक्त लोकशाहीत चर्चेनेच मार्ग निघतात. आज अनेक प्रश्न आहे , यावर चर्चा झाली पाहिजे. चर्चा झाल्यावर जे काही सत्य आहे ते बाहेर येईल अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना खासदार सुळे यांनी दिली. तसेच यावेळी त्यांनी नुकतंच निवडणूक आयोगाने 45 दिवसांमध्ये निवडणूक प्रक्रियेचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्याच्या निर्णयावर देखील टीका केली आहे.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आजकालच्या जगात जेवढे क्लाऊड सेंटर आहे त्यामुळे डेटा कायम ठेवणे हे काही मोठे काम नाही. निवडणूक आयोगाने पारदर्शक काम केले पाहिजे. बारामतीमध्ये सुद्धा पैसे वाटल्याप्रकरणी चर्चा सुरु आहे त्यामुळे या प्रकरणात पारदर्शकप्रमाणे काम झाले पाहिजे असं देखील खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भाषा बदल करण्याचा कारण काय?
तसेच माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी हिंदी सक्ती प्रकरणात देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शिक्षण हे अतिशय गंभीर विषय आहे. नवीन शिक्षण पॉलिसी सोपी असावी. मी स्वतः एसएससीमध्ये शिकले आहे. एसएससीमध्ये पहिली ते चौथी दोन भाषा आहे. त्यामध्ये बदल करण्याचा कारण काय? बदल करण्यासाठी काही डेटा पुरावे पाहिजे. फक्त मनमर्जी प्रमाणे बदल करता येत नाही असं माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महानिर्मिती राज्यात उभारणार 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पॅनलला आम्ही मदत करतो
तर माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत ज्या लोकांनी अजित पवार गटाला मतदान केले त्यांना शुभेच्छा, आम्ही सहकार चळवळीच्या निवडणुकीत लक्ष घालत नाही. जे पॅनल निवडून येतो त्या पॅनलला आम्ही मदत करतो असं माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.