Download App

अंदाज समितीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; चांदीच्या ताटातून सदस्यांचा शाही जेवणावर ताव

Estimates Committee चा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याची टीका या कार्यक्रमावर होत आहे.

Contervry about Program of Estimates Committee in Mumbai Members’ royal dinner on a silver platter : मुंबईमध्ये पार पडलेला अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेसाठी आलेल्या सदस्यांना थेट चांदीच्या ताटातून शाही जेवण देण्यात आले. ही जनतेच्या पैशांची बेधुंद उधळपट्टी असल्याची टीका या कार्यक्रमावर सध्या होत आहे. यावर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पोस्ट लिहून निषेध केला आहे.

काय म्हणाले विजय कुंभार?

जनतेच्या पैशांची बेधुंद उधळपट्टी, मुंबईत विधानभवनात देशभरातील विधीमंडळांच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी शाही थाटात भोजनाचा कार्यक्रम रंगला होता. या शाही जेवणासाठी प्रत्येक सदस्यामागे तब्बल साडेचार हजार रुपये उधळले गेले. विशेष बाब म्हणजे, चांदीच्या थाळीतून जेवण वाढण्यात आले, ज्याच्या थाळीचे भाडे 550 रुपये आणि जेवणाचा खर्च चार हजार रुपये होता. हा साडेचार हजारांचा शाही बेत केवळ 600 अतिथींसाठी तब्बल 27 लाख रुपयांवर जाऊन पोहोचला! खर्चात काटकसर करणाऱ्या शिफारशी करणाऱ्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठीच असा बेहिशेबी खर्च केला गेला, यामुळे सर्वसामान्यांचा संताप अनावर झाला आहे.

कधी हाताला, तर कधी पायाला फ्रॅक्चर, मराठी कलाकारांसाठी जून महिना ठरतोय काळजीचा!

दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या नावाखाली विधानभवनात हा उधळपट्टीचा खेळ खेळला गेला. मंगळवारी या परिषदेचा समारोप करताना सदस्यांना पंचपक्वान्नांची मेजवानी देण्यात आली. ज्या अंदाज समितीवर अर्थसंकल्पातील तरतुदींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारशी करण्याची जबाबदारी आहे, त्याच समितीच्या सदस्यांनी चांदीच्या ताटातून शाही जेवणावर ताव मारला. ही नुसती उधळपट्टी नव्हे, तर जनतेच्या पैशाची थट्टा आहे!

या परिषदेत देशभरातील 600 अतिथी, अध्यक्ष, सदस्य आणि अधिकारी सहभागी झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी विधानभवनाबाहेर 40 फूट उंचीचे भव्य फलक उभारले गेले, जणू काही एखाद्या राजघराण्याच्या स्वागताचा सोहळा! अध्यक्ष आणि सदस्यांसाठी हॉटेल ताज पॅलेसमध्ये, तर अधिकाऱ्यांसाठी हॉटेल ट्रायडंटमध्ये निवासाची सोय करण्यात आली. इतकेच नाही, तर विधीमंडळ प्रांगणात मलमली कापडाचे वातानुकूलित भोजन मंडप उभारले गेले, मोठमोठी झुंबरे लावली गेली, आणि सभागृहापासून भोजनस्थळापर्यंत लाल गालिचे अंथरले गेले. ही शाही व्यवस्था पाहता, सामान्य माणसाच्या कररुपी पैशाची अशी लूटमार करणाऱ्या या मंडळींना लाज कशी वाटली नाही? जनतेच्या पैशावर असा थयथयाट करणाऱ्यांना खरोखरच काटकसरीची भाषा समजते का? हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाच्या मनात घोळतोय!

follow us