Download App

जमिनीच्या तुकड्यासाठी काकू अन् चुलत भावाचे केले कुऱ्हाडीने तुकडे; वर्धा जिल्ह्यातील क्रूर घटना

वर्धा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतीचा वाद टोकाला गेला आणि त्यातून माणुकसीला काळीमा फासणारी घटना घडली.

  • Written By: Last Updated:

Wardha Crime : वर्धा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Wardha) शेतीच्या वादावरून झालेल्या वादात चुलत भावाने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने हत्या केली आहे. त्यानंतर आरोपीने विष प्राशन करून आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या धुऱ्याच्या वाटपावरून तसंच, ठोक्याने शेती लावण्यावरून वाद सुरू होता.

या दुहेरी खून आणि आत्महत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेत मृत झालेल्यांमध्ये साधना सुभाष मोहिजे (वय 55) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (वय 27) यांचा समावेश आहे. या दोघांची हत्या महेंद्र मोहिजे या त्यांच्या पुतण्याने केली. पोलीस तपासानुसार, गेल्या काही दिवसांपासून महेंद्र आणि नितीन यांच्यामध्ये शेतीच्या धुऱ्याच्या वाटपावरून वाद सुरू होता. गावातील काही जमिनी ठेक्याने लावण्यावरूनही तणाव वाढला होता.

सोमवारी बीड बंदची हाक; क्लासेसच्या गेटला फासले काळे, आरोपींना अट करा, पालक आक्रमक

अखेर तो वाद इतका टोकाला गेला की, महेंद्र मोहिजेने संतप्त अवस्थेत नितीन आणि त्याची आई साधना यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करत त्यांचा जागीच खून केला. या खुनाच्या घटनेनंतर महेंद्रने स्वतः विष प्राशन केलं आणि काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला. ही घटना समजताच अल्लीपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र मोहिजे हा साधना मोहिजे यांचा पुतण्या होता, तर नितीन मोहिजे त्याचा चुलत भाऊ होता. शेतीच्या मालकीहक्कावरून आणि उत्पन्नाच्या वाटपावरून अनेक दिवसांपासून हे वाद सुरू होते.सध्या पोलीस पुढील तपास करत असून, शेजारी आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात आहेत.

follow us