Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले असून त्यांनी आता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच चर्चेत आले आहे. बीडच्या एक खासगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रशांत खटावकर आणि विजय पवार अशी आरोपींची नावे आहे. आरोपींवर आमदार संदीप क्षीरसागर यांचा वरदहस्त असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणात भाष्य करत धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आज त्यांनी माध्यमांशी या प्रकरणात संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी गॉगल लावले होते. पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्यापासून मुंडे सतत गॉगल लावूनच फिरताना दिसत आहे. मात्र असं का? या पाठीमागचे कारण तुम्हाला माहिती आहे का?
सतत डोळ्यावर गॉगल कशासाठी?
गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे बेल्स पाल्सीने ग्रासले (Bell’s Palsy) होते मात्र आता ते बऱ्यापैकी सावरले आहे. या आजारामुळे धनंजय मुंडे यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर बेल्स पाल्सीचा त्रास व्हायला लागला होता. बेल्स पाल्सी झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या काही भागावर नीटपणे नियंत्रण राहात नाही. यामुळे त्यांचा एका डोळा बोलताना बंद होतो, ते वाईट दिसत असल्याने धनंजय मुंडे यांनी गॉगल लावण्याचा निर्णय घेतला आहे.
आमचे सहकारी, सहकारमंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.
श्री…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 18, 2025
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर शरद पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. तर आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले असून त्यांनी बीडच्या एका खासगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीचा लौंगिक छळ झालेल्या प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपला धक्का, आमदार टी राजा यांनी दिला राजीनामा; कारण काय?
बेल्स पाल्सी लक्षणे
जास्त तणाव किंवा मानसिक दडपणामुळे बेल्स पाल्सी हा आजार होऊ शकतो. तसेच अचानक थंडी लागणे किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी होणा, या व्यक्तींनाही हा आजार होऊ शकतो. याचबरोबर मधुमेहा किंवा इतर काही आरोग्य समस्या असलेल्यांनाही हा आजार होण्याची शक्यता असते. जेवणात मीठाचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळेही हा आजार होण्याची शक्यता आहे.