Vijaypat Singhania : रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष, पद्मभूषण डॉ. विजयपत सिंघानिया यांचं निधन

Vijaypat Singhania : रेमंड ग्रुपचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे शनिवारी सायंकाळी मुंबईत वयाच्या 87 व्या वर्षी

Vijaypat Singhania

Vijaypat Singhania

Vijaypat Singhania : रेमंड ग्रुपचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे शनिवारी सायंकाळी मुंबईत वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अत्यंत शांतपणे अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र गौतम सिंघानिया यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली.

त्यांनी लिहिले, “अतिशय जड अंतःकरणाने आम्ही तुम्हाला ‘पद्मभूषण’ डॉ. विजयपत कैलाशपत सिंघानिया यांच्या निधनाची बातमी कळवत आहोत.” त्यांनी आपल्या वडिलांचे वर्णन एक दूरदृष्टी असलेले नेते, परोपकारी व्यक्ती आणि एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असे केले. ज्यांचा वारसा भावी पिढ्यांना सदैव मार्गदर्शन करत राहील.

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांचे अंत्यसंस्कार रविवार, 29 मार्च रोजी दुपारी 3:00 वाजता मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत पार पडतील. त्यापूर्वी, दुपारी 1:30 वाजता ‘हवेली’, एल.डी. रूपारेल मार्ग येथे एक शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळचे सहकारी उपस्थित राहतील.

1938 मध्ये जन्मलेले विजयपत सिंघानिया (Vijaypat Singhania) यांची गणना देशातील अग्रगण्य उद्योगपतींमध्ये करण्यात येत होती . त्यांनी 1980 ते 2000 या काळात रेमंड समूहाचे नेतृत्व केले आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात कंपनीला यशाच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवले. ते केवळ एक व्यावसायिकच नव्हते, तर त्यांना विमानचालनाची (एव्हिएशनची) प्रचंड आवड होती. हॉट एअर बलूनद्वारे सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर होता.

1988 मध्ये, लंडन ते दिल्ली असा 23 दिवसांचा ‘मायक्रोलाईट’ विमान प्रवास पूर्ण करून त्यांनी आणखी एक विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या या योगदानाची दखल घेत, भारत सरकारने 2006 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. याव्यतिरिक्त, 2001 मध्ये त्यांना ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ (Tenzing Norgay National Adventure Award) प्रदान करण्यात आला होता.

रुपाली चाकणकरांनंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष कोण? ‘या’ 5 नावांची चर्चा

भारतीय हवाई दलाने 1994 मध्ये त्यांना ‘एअर कमोडोर’ ही मानद पदवी बहाल केली होती आणि 2006 मध्ये त्यांनी ‘मुंबईचे शेरीफ’ म्हणूनही कार्यभार सांभाळला होता. 2015 मध्ये, त्यांनी रेमंड समूहातील आपला 37% हिस्सा (मालकी हक्क) आपले पुत्र गौतम यांच्या नावे हस्तांतरित केला होता ज्या निर्णयामुळे पुढे जाऊन कौटुंबिक वाद निर्माण झाल्याची देखील माहिती समोर आली होती.

Exit mobile version