Prakash Ambedkar : महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीच्या निकालावरुन राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकारण तापले असून विरोधक या निकालावर संशय व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील या निकालावरुन निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सायंकाळी 6 नंतर वाढलेल्या 76 लाख मतदारांचा आकडा संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
तर वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे (Chetan Chandrakant Ahire) यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर निकाल देत उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते चेतन चंद्रकांत अहिरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर अचानक वाढलेल्या 76 लाख मतांबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) बाजू मांडत होते. या याचिकेत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. तसेच याचिकाकर्तेने आमचा कालचा कामकाजाचा वेळ वाया घातला असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
चेतन चंद्रकांत अहिरे बनाम भारत संघ एवं अन्य मामले में फैसला आ गया है। डिवीजन बेंच ने याचिका खारिज कर दी है।
एक बार फैसला अपलोड हो जाए और मैं पढ़ लूं कि किस आधार पर इसे खारिज किया गया है, मैं अपनी प्रतिक्रिया दूंगा।
मैं कल सुबह 11:30 बजे मुंबई में वंचित बहुजन अघाड़ी के मुख्य… pic.twitter.com/WwyWeYtyMO
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 25, 2025
तर दुसरीकडे न्यायालयाने याचिका फेटाळण्याचं कारण काय हे पाहून मी माझी प्रतिक्रिया देणार, 26 रोजी सकाळी 11.30 मुंबईतील कार्यलयात पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
पुणे मेट्रो लाईन 2 साठी 3626 कोटी रुपये मंजूर; मोदी सरकारचे पुणेकरांना गिफ्ट
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना काल ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतांची आकडेवारी शेअर करत पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली आहे.