Download App

स्वातंत्र्यदिनी राज्यातल्या कैद्यांना मुक्त करणार? केंद्रीय गृह सचिवाची माहिती

येत्या 15 ऑगस्टला देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यांत विशेष माफी देण्यात येत आहे. माफीच्या तिसऱ्या टप्प्यांनूसार स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना माफी देऊन मुक्त करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय गृह सचिवाकडून देण्यात आली आहेत.

अमित शाहांनी राहुल गांधींपेक्षा जास्त मूर्खपणा केला; बच्चू कडूंनी सुनावलं

माफी योजनेंतर्गत या कैद्यांना विशेष माफी देऊन मुक्त करण्यात येणार आहे. कैद्यांनी गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. कैद्याने शिस्त आणि आचरण निश्चित करणं हा माफी योजनेचा उद्देश आहे. केंद्रीय गृह सचिवाकडून माफी योजनेची वैशिष्ट्ये आणि माफी योजनेकडून निकष विहित करण्यात आले आहेत.

‘सर सलामत तो पगडी पचास, पुन्हा असं करू नका’; आव्हाडांचा CM शिंदेंना मैत्रीचा सल्ला

पहिल्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2022 रोजी 206, दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 जानेवारी 2023 रोजी 189 बंद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 बंद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश शासनाने निर्गमित करण्यात आले आहेत. अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये आत्तापर्यंत एकूण 581 बंद्यांना विशेष माफी देऊन कारागृहातून मुक्त करण्यासंबंधीची कारवाई राज्य शासनाकडून करण्यात आलीयं.

दरम्यान, राज्यातील बंद्यांची पात्रता तपासण्यासाठी 9 जून 2022 च्या शासन निर्णयान्वये अपर मुख्य सचिव (अ.व सु.), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तपासणी समिती गठीत करण्यात आली. या समितीमार्फत शिफारस करण्यात आलेल्या बंद्याच्या प्रस्तावास राज्यपाल यांची मान्यता घेण्यात आली आहे.

Tags

follow us