Download App

Barsu Refinery : सरकारच्या विरोधात ठाकरे गटाचा आज मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

  • Written By: Last Updated:

Barsu Refinery : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सरकारवर मोठा हल्लाबोल केला होता. काल आंदोलक ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती.

दरम्यान बारसू रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्पाच्या विरोधात आज मोर्चा काढला जाणार आहे. गेल्या काही दिवसापासून बारसू रिफायनरी विरोधात ज्या माळरानावर आंदोलन केलं जात आहे, त्याच माळरानावर आज मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचं नेतृत्व ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत करणार असल्याचे सांगितले जात आहे.

बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती…; मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

प्रशासन तयारीत

आज ठाकरे गटाकडून काढण्यात येणाऱ्या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून रिफायनरीविरोधी नेत्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाल्याचे पाहायला मिळतंय. रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते अशोक वालम हे पोलिसांच्या ताब्यात आहेत.

उद्धव ठाकरेही बारसूला जाणार

दरम्यान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) बारसू (Barsu Refinery) परिसराला भेट देणार आहेत. त्या प्रकल्पच्या परिसरातील पाचही गावातील नागरिकांना ते भेटणार आहेत. अशी माहिती काल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली होती.

भावी मुख्यमंत्री, उत्साही कार्यकर्ते, नेत्यांना गुदगुल्या

काल देखील आंदोलक त्यांचे प्रश्न घेऊन उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांची यावर चर्चा देखील झाली. त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बारसू परिसराला भेट देणार आहेत. त्या प्रकल्पच्या परिसरातील पाचही गावातील नागरिकांना ते भेटणार आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.

Tags

follow us