Bharat Gogawale : वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असलेले शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) आता पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. नारायण राणेंनी मर्डर, मारामाऱ्या, भानगडी केल्या, सगळं झालं असं विधान मंत्री भरत गोगावले यांनी केलंय. विशेष म्हणजे ज्यावेळी गोगावलेंनी हे विधान केलं, त्यावेळी निलेश राणे हे व्यासपीठावर होते. गोगावलेंच्या या विधानामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यादरम्यान, गोगावले यांनी नारायण राणे यांच्याबद्दल खळबळजनक विधान केलंय. नारायण राणे एवढ्या सहजासहजी उंचीवर गेलेले नाहीत, अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामारी केल्या, मर्डर सगळं. वेगळं काही सांगण्याची आवश्यकत नाही, असं विधान गोगावले यांनी यावेळी केलंय.
पुढे बोलताना भरत गोगावले म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण गेले अनेक वर्ष पाहतोय. निलेश राणेंच्या रुपाने सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद मिळाली. भानगडी केला नाही तो शिवसैनिक नव्हे. केसरकर भानगडी करणारे नाहीत त्यामुळे अडचण होते. मात्र निलेश राणे जशास तसं उत्तर देणारे आहेत. पण आता भानगडी करायचे दिवस संपले आहेत. निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही. सगळं जुळवून चालवायचं आहे असं मंत्री भरत गोगावलेंनी स्पष्ट केलंय.
सोमवारी बीड बंदची हाक; क्लासेसच्या गेटला फासले काळे, आरोपींना अट करा, पालक आक्रमक
तसेच आम्हाला तुम्ही निवडून दिलात आता त्याची परत फेड करण्यासाठी आम्ही आलो आहोत. येत्या चार महिन्यात निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवताना अत्यंत सावध रहावे लागते. तुम्हाला लागेल ती ताकद देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. केसरकर साहेब भानगडी करणारे नाहीत. ज्याने भानगड केली नाही तो शिवसैनिक होऊ शकत नाही. काही पक्ष आपण शत प्रतिशत आहोत असं म्हणतात. मग आम्ही पण शत प्रतिशत जाऊ शकत नाही का? कोकणात आज आपला पक्ष नंबर एक असल्याचंही ते म्हणाले आहेत.
आम्ही गरीबांचे शेठ, श्रीमंतांचे नाहीत…
आम्ही गरिबांचे शेठ आहोत, श्रीमंताचे नाही. आमच्याकडे मनाची श्रीमंती आहे. आम्ही पालकमंत्री पण होऊ, आम्ही काम करतोय. त्याचा मोबदला मागतोय. सगळीकडे महायुती म्हणून जुळेल असंही नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचे दोन तर भाजपाचा एक आमदार आहे. आम्हाला समजून घेतलं तर आम्ही समजून घेऊ. माझ्या खात्यात कोकणाला झुकत माप देऊ, असंही ते म्हणाले आहेत.