Download App

Uddhav Thackeray : आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करता, तुमचा आगापिछा काय?

रत्नागिरी : दु:ख या गोष्टींच वाटतं की कुटुंब, परिवारवाद अशी आमच्यावर टीका करतात. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, अभिमानाने सांगतो बाळासाहेबांचा पुत्र आहे. माझे वडील अभिमानाने सांगायचे होय मी प्रबोधनकारांचा पुत्र आहे. नाही म्हटलं तरी आमची ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रातील जनतेसाठी राबते आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना तुमचा आगापिछा काय? पहिली तुमची वंशावळ कुठली ते तरी सांगा आम्हाला? असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटाला केला आहे.

तुमची मुलं कुठल्यातरी कमिटीची अध्यक्ष बनवून मोकळे करायचे आणि कुटुंबच्या कुटुंब उधवस्त करायचे? घराणे संपून टाकायचे? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आठ पंधरा दिवसांपूर्वी निवडणुका झाल्या. कसब्यात तर साफ झालं. चिंचवडमध्ये बंडखोरी झाली नसती तर यांचा सुफडा साफ झाला असता. अंधेरीत लढायची हिंमत नव्हती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Uddhav Thackeray : भाजपमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचारी लोकं… तिथे सगळे संधीसाधू दिसतात!

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त शाळेत शिकणार आहात की प्रत्यक्ष तुमच्या जीवनात आमलात आणणार आहात? आज खंडोजी खोपडेंची पिलावळ महाराष्ट्रात किती माजली आहे? आणि कान्होंजी जेधे नाईकांचे वारसदार या महाराष्ट्रात किती निपजलेत हे महाराज बघत आहेत. महाराष्ट्रावर येऊ दे किती खान यायचे ते. असे अनेक खान आलेले आहेत. हल्ली मी त्यांना मोगॅबो बोलायला लागलो आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे.

लोकांना लढवत ठेवायचं, भ्रमात ठेवायंच. तुम्ही लढत राहिलात की आम्ही खात राहतो, अशी यांची पध्दत आहे. राजन साळवी आणि वैभव नाईक यांची काय संपत्ती आहे? आज जागतिक स्तरावर मोठा घोटाळा फुटलेला आहे त्याची चौकशी करा. यांच्याकडे काय भेटणार आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे.

follow us