Download App

मुंबई, पुणे महापालिकांच्या निवडणुका आणखी लांबणीवर! समोर आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Municipal Elections Postponed : राज्यात स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं (Maharashtra Municipal Elections) बिगुल वाजलंय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता मतदानाची लगबग सुरू झाली होती. राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिले होते. त्यानंतरच निवडणुकांची तयारी सुरू झाली होती. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका, (Maharashtra Politics) नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार असल्याचं चित्र होतं. परंतु आता हा मुहूर्तही टळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता दिवाळीनंतरच मुहूर्त ( BMC Election) मिळणार असल्याचं दिसतंय.

नवीन आदेश जारी

नगरविकास विभागाने नवीन आदेश जारी केलाय. या आदेशानुसार आता मुंबई महानगरपालिका प्रभाग रचना अहवाल आता 6 ऑक्टोबरपर्यंत सादर करता येणार आहे. ड वर्गातील महापालिकेचा अहवाल 13 ऑक्टोबरपर्यंत सादर करता येणार आहे. नगर परिषद (Supreme Court) आणि नगरपंचायतीसाठी 30 सप्टेंबर ही मुदत आहे.

क्रिकेट वर्तुळातून दु:खद बातमी; भारताचे माजी स्पिनर दिलीप दोशी यांचं ७७ व्या वर्षी निधन

चार आठवड्यांत अधिसूचना

राज्यामध्ये सध्या बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवट लागू असून ही यंत्रणा केवळ अधिकारी वर्गाच्या ताब्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यामध्ये स्पष्ट आदेश दिले होते. 4 महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी. त्याआधी चार आठवड्यांत अधिसूचना जाहीर करावी, असे स्पष्ट निर्देश दिले होते.

निवडणुका लांबणीवर

मुंबई महानगरपालिका, इतर महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आता दिवाळीनंतर निवडणुका होणार हे निश्चित झालं असून, त्यासाठी शासकीय हालचाली देखील गतीमान झाल्या आहेत. प्रभाग रचनेच्या कालमर्यादेला वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्याचे म्हटले जात आहे.

हिंदीसक्ती बाबत मुख्यमंत्री फडणवीस अजूनही ठाम, सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय

सोमवारी नगरविकास विभागाने प्रभाग रचनेच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. त्यांनी अहवाल सादरीकरणासाठीची मुदत वाढवली. प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर त्याचे प्रारुप जाहीर करणे, त्यावरील हरकती, आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर या हरकती, सूचनांवर सुनावणी पार पडणार असून प्रभाग रचनेच्या अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे निवडणुका दोन ते तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर अथवा डिसेंबर यादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, असं दिसतंय.

 

follow us