Government Supports Farmers Dattatreya Bharane Announcement : मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची शक्यता अधिकच वाढली आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांकडून एकमुखाने हा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वीच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी सरकार या दिशेने सकारात्मक पावलं उचलणार असल्याचे संकेत दिले होते.
अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे 70 लाख एकरवरील (Rain Update) पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज अधिकृतरीत्या वर्तवण्यात आला आहे. विशेषत: नदीकाठची व ओढ्याकाठची शेती (Farmer) वाहून गेली असून जमीनसुद्धा पाण्याच्या प्रवाहात नष्ट झाली आहे. पिकांबरोबरच पशुधनाचे आणि घरांचेही नुकसान (Dattatraya Bharane) झाले आहे. नांदेड, यवतमाळ, जालना, परभणी आणि बीड हे जिल्हे सर्वाधिक बाधित झाले असून एकूण 30 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
या आपत्तीचा सामना करण्यासाठी नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी पंचनामे पूर्ण होऊन नुकसानभरपाई दिली गेली आहे, तर उर्वरित ठिकाणी दिवाळीपूर्वी मदत पोहोचवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कृषीमंत्री भरणे म्हणाले, हे निसर्गाचे संकट आहे, पण शेतकरी एकटा नाही. सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे.
नुकसानभरपाई देताना केंद्र आणि राज्य सरकारने ठरवलेले निकष महत्त्वाचे असले तरी सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यावर शासन भर देत आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळे मदतीसाठी निकषांपलीकडे जाऊनही विचार केला जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.