Download App

राज्यात आजपासून मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट

मराठवाडा, विदर्भ आणि कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल.

Image Credit: Letsupp

Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. राजधानी मुंबईसह काही जिल्ह्यांत (Weather Update) मात्र पाऊस सुरू होता तर काही ठिकाणी पावसाने ओढ (Rain Alert) दिली होती. आता या पावसाबाबत हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून आजपासून अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात (Monsoon Update) अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुढील 48 तास ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी

पावसाची शक्यता पाहता काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जाीरी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांत तर पावसाला सुरुवात झाली आहे. या भागात येत्या तीन ते चार तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज कोकणात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता दिसून येत आहे.

मुंबई, ठाणे, पु्णे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. काही भागात दुबार पेरणीचं संकट उभं राहण्याची चिन्हे आहेत. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.

Pune Rain : कोथरुड, बाणेरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

दरम्यान, महाराष्ट्रात आल्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीला ‘ब्रेक’ लागल्याची स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला असून, गेल्या सहा दिवसांपासून त्याच्या वाटचालीत फारशी प्रगती झाली नाही, अशी माहिती हवामान खात्याने रविवारी दिली. सध्या राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. विदर्भात कमाल तापमान पुन्हा चाळीशीपार गेले आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान विदर्भातील चंद्रपूर येथे ४१.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. बम्हपुरी आणि वर्धा येथे पारा ४० अंशांपार आहे.

याच बरोबर मान्सून येत्या काही दिवसांत उत्तर भारतासह इतर राज्यांत पोहोचण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये मान्सून दाखल झाला आहे तर राजस्थानमध्ये 30 जून आणि 5 जुलै दरम्यान मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

follow us

वेब स्टोरीज