Maharashtra Weather Update : राज्यात सध्या अवकाळी पाऊस जोरात (Maharashtra Weather Update) सुरू आहे. या पावसामुळे उकाडा कमी झाला आहे. मात्र शेती पिकांचे मोठे नुकसान झाला आहे. त्यातच आता राज्यात नेहमीपेक्षा एक आठवडा आधीच मान्सून दाखल (Monsoon) होणार असल्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत राज्यात अवकाळीचा मुक्कामही (Unseasonal Rain) कायम राहणार आहे. हवामान विभागाने राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांत अतिमुसळधार, यलो अलर्ट जारी; पुढील 48 तास पावसाचे..
राज्यात पाऊस पुढील आठवड्यातही हजेरी लावण्याची शक्यता आहे. 20,21 आणि 22 मे रोजी तळ कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 31 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. या राज्यात दाखल होईपर्यंत मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचं आगमन झालं आहे. या ठिकाणी सध्या हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमानात वाटचाल करणार आहे. नियोजित वेळेच्या एक आठवडा आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. पुढील काही दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, अंदमान निकोबारसह मध्य बंगालच्या उपसागरात विस्तार करेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानंतर हळूहळू केरळ आणि महाराष्ट्राकडे मान्सून वाटचाल सुरू करील अशी शक्यता आहे.
राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! मराठवाडा अन् विदर्भात धो धो कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
मान्सूनचे आगमन केरळमध्ये त्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षा आधीच होण्याची शक्यता आहे असे पुणे हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले. राज्यात सध्या उकाडा कमी झाला आहे. कारण राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे हवामानात बदल झाला आहे. आजही काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आहे.