आता मला लोक पवारांचा माणूस म्हणतील; रोहित पवारांच्या आंदोलनात जरांगे पाटलांची टोलेबाजी

तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांची तब्येत खालावली आहे, बीपी आणि शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

Rohit Pawar (2)

आता मला लोक पवारांचा माणूस म्हणतील; रोहित पवारांच्या आंदोलनात जरांगे पाटलांच बेधड भाषण

सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाख (Farmer) रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. परंतु त्यामध्ये अशी एक अट आहे, की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असेल त्यांना आधी ही उर्वरीत रक्कम भरावी लागणार आहे, त्यानंतरच शेतकऱ्यांना या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. मात्र ही अट सरकारने रद्द करावी आणि सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यांनी आपल्या या मागणीसाठी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.

आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांची तब्येत खालावली आहे, बीपी आणि शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. दरम्यान आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंढरपूर येथे रोहित पवार यांची भेट घेतली आहे. शेतकरी वाचला नाही तर राज्य, देश कसा चालणार? असा सवाल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

तीन दिवसांपासून अन्न नाही; रोहित पवारांची तब्येत खालावली, पत्नी मुलांना अश्रू अनावर

दरम्यान पुढे बोलताना तुम्ही कितीही पोटतिडकीनं आंदोलन केलं तरी लोकं त्याला राजकारणच समजणार. या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पाहिलं पाहिजे, शेतकरी म्हणून रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा. रोहित पवारांनी जीआरमध्ये शब्दचा खेळ कसा असतो ते दाखवून दिलं. मी इथे आलो, त्यामुळे आता काही लोक मला रोहित पवारांचा माणूस म्हणून बोलायला लागतील.

मोदी पवारांना जीव लावतात मग, आंदोलनाची वेळ का? जर सरकार चर्चेसाठी बोलावत असेल तर चर्चेतून मार्ग काढा, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान, उपोषण करणं हे खूप कठिण काम आहे, माझे हाडं ठिसूळ झाले आहेत. डॉक्टरांना सलाईन लावण्यासाठी माझी नस सापडत नव्हती, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आज रोहित पवार यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

Exit mobile version