Jalna Shivsena UBT : राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण (Jalna Shivsena UBT) पराभव झाला. त्यानंतर आघाडीतील तिन्ही पक्षांना गळती लागली आहे. यातही ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) जास्त धक्के बसले आहेत. माजी आमदार, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. आताही ठाकरेंना धक्का देणारी बातमी मराठवाड्यातून आली आहे. जालन्यातील (Jalna News) ठाकरे गटाचे नेते डॉ. संजय लाखे पाटील यांनी पक्षाच्या सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी एक खरमरीत पत्रही लिहिलं आहे. शिवसेना का सोडावी लागली, याची कारणं त्यांनी या पत्रात दिली आहेत. या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंनी मला पक्षात प्रवेश करा असं सांगितलं. जालना लोकसभेची (Jalna Lok Sabha) जागा आपण सोडवून घेऊ आणि सांगली काँग्रेसला देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या शब्दाखातर मी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर मी अनेकदा जालना सोडा असं सांगत होतो. पण संजय राऊत आपला वेगळाच अजेंडा चालवतात. संजय राऊत यांनी तडजोड केली. सांगली शिवसेनेकडेच (Sangli News) ठेऊन घेतली. सांगलीत पक्षाची ताकद नाही. याठिकाणी कमकुवत उमेदवार दिला गेला.
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत का? छगन भुजबळांचं क्लिअर उत्तर, म्हणाले, “आम्हाला वाटतं की..”
यानंतर मला पक्षात सचिवपदाची जबाबदारी दिली गेली. मी निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलं. पण तरीही मला संघटनात्मक कामकाजातून वगळण्यात आलं. दानवे यांनी स्वतःचं नेतृत्व पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. मला डावलण्याचा प्रयत्न केला. तसेच नियुक्त्यांमध्ये स्वतःचीच मनमानी केली असे आरोप लाखे पाटील यांनी या पत्रात केले आहेत.
राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रशासनाच्या पातळीवरही तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना सध्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्यात पक्षबांधणीचं मोठं आव्हान आहे. या आव्हानाला तोंंड देत असतानाच कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांसमोर हेच मोठे आव्हान सध्या आहे. पक्षगळती रोखून निवडणुकांना सामोरे जाण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.