Pankaja Munde Speech At Gopinath Munde Punyatithi : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज गोपीनाथ गडावर 11 वा स्मृतिदिन (Gopinath Munde Punyatithi) आहे. यानिमित्त परळीत वेगवगेळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आज गोपीनाथगडावर एकत्र होते. तब्बल 11 वर्षांनंतर आज मुंडे बहिण-भावांनी एकत्र गोपीनाथ गडावर हजेरी लावली. मंत्रीपद गेल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) नेमकं काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष होतं. परंतु त्यांनी बोलणं टाळलं. तर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कार्यकर्त्यांना गडावरून जाहीरपणे संबोधित केलं.
मुंडे साहेबांचे संस्कार, मुंडे साहेबांचे विचार आहेत. माणूस चुकतो, आम्ही चुकलो असेल. काही झालं असेल. गोपीनाथ मुंडे आजही जिवंत आहेत. ते आमच्यामुळे जिवंत नाही, ते त्यांच्या कर्तृत्वामुळे जिवंत (Beed News) आहेत. ते पुण्यात्मा आहेत. त्यांनी कधीही कोणाबद्दल वाईट चिंतलं नाही. सामान्यांचा वाली त्यांना अशा गोष्टींमधून मिळाली. आज गोपीनाथ मुंडे असते, तर ते खूप मोठ्या पदावर असते, असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.
धुळे शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरणात मोठी अपडेट! फरार राजकुमार मोगले पोलिसांच्या ताब्यात
आज अकरा वर्ष झाले, गावोगावात मुंडे साहेबांची जयंती साजरी होते. तुमच्यामुळे आमच्या कुटुंबाला बळ मिळते, असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. अपघाताने माणसं दुरावतात, अपघाताने माणसं एकत्रही येतात, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. चांगल्या माणसांनाच त्रास होत असतो. कौरव, रावणाला कधी त्रास झाला? तुम्ही सोबत असाल तर आम्ही यातना सोसायला देखील तयार आहोत, असंही त्यांनी म्हटलंय.
आज जे वैभव आम्हाला प्राप्त झालं आहे, ते म्हणजे लोकांचं प्रेम. बाबा जिथे कुठे असतील, त्यांना हे बघून आनंद होत असेल असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. आज मुंडे कुटुंबियांतर्फे केवळ पंकजा मुंडे यांनीच भाषण केलंय.
मीच काय 10 ते 12 जण नाराज; ठाकरेंच्या बड्या नेत्याची जाहीर कबुली; मोठा राजकीय खेळ होणार….
तर गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनंजय मुंडे यांनी सोशल मिडियावरती एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, आयुष्यभरातील प्रत्येक संघर्ष संकट नाही, तर संधी म्हणून तुम्ही सामोरे गेलात. तुमच्याच प्रेरणेने आज संघर्षाच्या वाटेवर निखारे तुडवत चालतो आहे, पण उतनार नाही, मातणार नाही.
अप्पा, तुमच्यासारखा लोकनेता आम्ही अनुभवला हे आमचं भाग्य! नियतीने अकाली तुम्हाला आमच्यापासून हिरावून नेले, किती ते दुर्भाग्य! सदैव स्मरणात
#लोकनेता”, म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.