Ashadhi Wari : आषाढी वारी सुरु असल्याने संपूर्ण राज्यात एक भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. लाखो लोक ‘माऊली माऊली’ चा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहे. तर दुसरीकडे दौंडमधून (Daund) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पंढरपूरकडे (Ashadhi Wari) जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून त्यांच्यासोबत लुटमारीची घटना घडली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली असून आरोपींना अटक करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
माहितीनुसार, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते. चहा घेतल्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरुन आले आणि त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयत लावला आणि वारकऱ्यांना लुटले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. या धक्कादायक घटनेनंतर दौंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरु केला आहे.
चिमुकलीने चॉकलेट मागितले बापाने गळा घोटला; मद्यपी बापाचं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य
तर दुसरीकडे वारकऱ्यांची फसवणुकीची धक्कादायक घटना घडली होती. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चालत असलेल्या काही भाविकांना तुम्हाला देवाच्या टोकन दर्शनाचे पास शंभर रुपयात देतो, असं सांगून सासवड परिसरात वारकऱ्यांची फसवणुक करण्यात आली आहे.