Ahilyanagar to Pandharpur Wari-पारंपरिक वारीच्या (Pandharpur Wari)भक्तिरसात आधुनिक फिटनेसची जोड देणारा आगळावेगळा उपक्रम ‘रनवारी 2025’ यशस्वीरीत्या पार पडला. अहिल्यानगरहून (Ahilyanagar) प्रारंभ झालेली ही धावणारी वारी म्हणजे भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि शारीरिक शिस्तीचे प्रतीक ठरली.
माळीवाडा येथील श्री.विशाल गणपती मंदिरापासून या उपक्रमाचा शुभारंभ झाला. श्री. गणेशाचा आशीर्वाद घेऊन उत्साहात धावपटूंनी पंढरपूरच्या दिशेने धाव सुरू केली. सलग दोन दिवसांच्या रिले पद्धतीत, निवडक 18 धावपटूंनी सुमारे 200 किमीचे अंतर पार करत पंढरपूरच्या मुख्य विठ्ठल मंदिरात हा अध्यात्मिक प्रवास संपन्न केला. (
Ahilyanagar to Pandharpur Wari)
Aashadhi Wari 2023 : मुख्यमंत्र्यांसोबत नगर जिल्ह्यातील वारकऱ्याला शासकीय महापूजेचा मान
या रनवारीमध्ये राजेंद्र घोडके, विलास भोजने, गौतम जायभाय, योगेश खरपुडे, ऋतिक पटेल, वैभव वाघ, सूर्यकांत पारधी, नीलम पंडित, स्मिता उकिर्डे, हरीश काबरा, भूषण मालू ,शेखर आंधळे, जगदीप मकर, अल्ताफ पठाण, चेतन अग्रवाल, विजय फुलसौंदर, हर्षल अग्रवाल, निलेश संकलेचा, दिलीप पवार आदी सहभागी झाले होते. रनवारी ही केवळ धावण्याची शर्यत नव्हे, तर चालत्या पावलांनी विठ्ठलाच्या भक्तीत रंगण्याचा एक अनोखा उपक्रम आहे, असे मत उपक्रमाचे मुख्य समन्वयक योगेश खरपुडे यांनी व्यक्त केले. या उपक्रमामागील हेतू स्पष्ट करताना जगदीप मकर म्हणाले, युवा पिढीला पारंपरिक भक्तीचा अनुभव देतानाच त्यांच्यातील फिटनेसची जाणीव निर्माण करणे हे ‘रनवारी’चे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या पहिल्या धावत्या वारीमध्ये केवळ ‘टीम ARC’ या संघातील निवडक धावपटूंना सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती. प्रत्येक टप्प्यावर धावपटूंनी जबाबदारीने आपले योगदान दिले. रूट प्लॅनिंग, हायड्रेशन, लॉजिस्टिक सपोर्ट, मेडिकल मदत, जेवण व विश्रांतीसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले होते, जे संघभावनेतून प्रभावीपणे पार पाडले गेले. ही वारी सामाजिक जाणीवा, फिटनेस, आणि अध्यात्म यांचा संगम ठरली. शहरभरातून या अभिनव उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. ‘रनवारी 2025’ ही सुरुवात आहे. पुढील वर्षी हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात करून सर्व अहिल्यानगरच्या धावपटूंना खुला करून साजरा करण्यात येईल. असे आयोजकांनी सांगितले.