Download App

“मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहणारे यंदा आमदारही होणार नाहीत”, सुजय विखेंचा थोरातांना खोचक टोला

मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे यंदा आमदार सुद्धा होऊ शकणार नाहीत असा खोचक टोलाही विखेंनी लगावला.

Sujya Vikhe Criticized Balasaheb Thorat : ‘संगमनेरमधील आजची सभा हा फक्त ट्रेलर आहे. या तालुक्यात परिवर्तन करण्यासाठी महीलांचा वाटा खूप मोठा असणार आहे. युवकांनी सुद्धा मागे न राहाता तालुक्यातील दहशत झुगारून परीवर्तनासाठी पुढे आले पाहीजे. तालुक्यातील ठेकेदारी संस्कृती तुमचा विकास करू शकणार नाही’, अशा शब्दांत माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे यंदा आमदार सुद्धा होऊ शकणार नाहीत असा खोचक टोलाही विखेंनी लगावला.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा संकल्प मेळाव्यात डाॅ. सुजय विखे पाटील यांनी थोरातांच्या चाळीस वर्षांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. विखे म्हणाले, ‘वर्षानुवर्ष या भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवू न शकलेले कोणत्या विकासाची भाषा करतात? असा प्रश्न करून या तालुक्यात फक्त नातेवाईकांसाठी राजकारण झाले. ठेकेदार आणि जमीनीचा ताबा मिळवणारे एवढीच ओळख पद वाटताना दाखवली जाते. पण तळेगाव निमोण भागातील तरुणांनी या मातीची शान राखून परीवर्तन केले. असेच परिवर्तन आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करायचे असून दोन दिवसांत पक्षाचा निर्णय होऊन संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाट्याला येईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विखेंची खेळी, थोरातांना बालेकिल्ल्यात धक्का; शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल

विखे पुढे म्हणाले, ‘चाळीस वर्षे तालुक्याला मोठी पदं मिळाली. पण निधी आणता आला नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तळेगावला ४४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. निळवंडे धरणाचे पाणी आले. अनेक वर्षे त्यांनी (बाळासाहेब थोरात) फक्त विखे पाटील परीवारावर टिका केली. पण साईबाबांच्या आशीर्वादाने विखे पाटील कुटुंबातील मुलगाच जिल्ह्याचा पालकमंत्री झाला आणि निळवंड्याचे पाणी आणून दाखवले. आता भोजापूर चारीचे पाणी सुद्धा विखे पाटीलच आणून दाखवतील’, असा दावा सुजय विखेंनी केला.

‘अनेक वर्ष एकाच घरात सता असल्याचा आरोप करून आता तुमची मनमानी बस झाली. आजची सभा तालुक्यातील परिवर्तनाची नांदी आहे. आमचा कार्यकर्ता पाकीट संस्कृतीत वाढलेला नाहीट, अशा तिखट शब्दांत विखेंनी थोरातांच्या दहशतीचा समाचार घेतला.

यशोधनच्या सूत्रांवर विश्वास ठेवू नका

सुजय विखेंना तिकीट नाकारले अशा बातम्या जाणीपूर्वक पेरल्या आहेत. कोणत्या सूत्रांची माहीती आहे तुम्हाला माहीत आहे. यशोधनच्या सूत्रांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करून संगमनेरचा मतदारसंघ भाजपाला मिळणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Video: हर्षवर्धन पाटील क्षमता असलेला नेता; त्यांचा ‘तो’ निर्णय चुकला, काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

follow us