Download App

CM शिंदेंच्या PM मोदींकडे पाच मोठ्या मागण्या; शेतकऱ्यांचं टेन्शन मिटणार, नदीजोड होणार गतीमान..

मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. कोकणाच्या बाबतीतही केंद्र सरकारने विचार करावा.

Eknath Shinde in Jalgaon : महाराष्ट्राच्या विकासासाठी मोदींचं सहकार्य आणि पाठिंबा मिळत राहिल. मोदींच्या नेतृत्वात आता शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं उद्दीष्ट आहे. मूल्य स्थिरीकरण योजनेंतर्गत बफर स्टॉकसाठी कांदा खरेदीवर मूल्यनितीचा विचार करा. कपाशी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निश्चित विचार करतील आणि दूधाच्या मुद्द्यावरही नक्कीच विचार करतील. यासह मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. कोकणाच्या बाबतीतही केंद्र सरकारने विचार करावा, अशा काही महत्वाच्या मागण्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या. जळगाव येथे आजोजित लखपती दीदी संमेलनात शिंदे बोलत होते. व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार रक्षा खडसे, शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव आदी उपस्थित होते.

शिंदे पुढे म्हणाले, राज्यातील दु्ष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार नदीजोड प्रकल्पावर भर देत आहे. नीती आयोगाच्या बैठकीत मोदींनीही सांगितलं होतं की राज्य सरकारने नदीजोड प्रकल्पावर काम करावं. त्यानुसार आता मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. कोकणाच्या बाबतीतही केंद्र सरकारने विचार करावा, अशी मागणी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केली.

स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त काम आमच्या दहा वर्षात झालं; जळगावच्या सभेत मोदींचा विरोधकांवर घणाघात 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प करू या. तुमचा प्रतिसाद चांगला तुमचं मनापासून अभिनंदन करतो. ज्या लखपती झाल्यात त्यांनी इतर महिलांना लखपती दीदी होण्यास मदत करा. राज्य सरकार भक्कमपणे तुमच्या पाठिशी उभे राहिले असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या योजनांचा उल्लेख केला. सरकारने राज्यातील महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या. 75 लाख कुटुंब बचतगटाशी जोडले. आगामी काळात ही संख्या दोन कोटींपर्यंत नेणार आहोत, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

follow us