Download App

किसान पुत्राची कमाल! पेरणी केल्यावर पिकांना दोन महिने पाण्याची गरज लागणार नाही?; कृषिमंत्र्यांकडून संशोधनाची दखल

  • Written By: Last Updated:

जळगाव : नेहमीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात सतत पाणीप्रश्न निर्माण होतो. त्यामुळं अनेकदा पावसाच्या अभावी दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवतं. शिवाय, अनेकदा पावसाअभावी पिकं देखील करपून जातात. हीच बाब लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) शेतकरी पुत्र आणि मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सुनील पवार (Sunil Pawar) या तरुणाने शेती क्षेत्रात अत्यंत प्रभावी असं संशोधन केलं. सुनील यांनी एक जैविक पावडर (Biological powder) निर्माण केली.

https://www.youtube.com/watch?v=3UoWv9XTJzE

सुनील पवार यांनी एक विशिष्ट जैविक पावडर उत्पादित केली आहे. ही जैविक पावडर पेरणीच्या वेळी बियाण्यासोबत मिश्रण केल्यानंतर संबंधित पिकाला दीड ते दोन महिने पाण्याची गरज लागत नाही, असं त्यांनी सांगितलं. या पावडरचे पेटंट देखील सुनील पवार यांनी नोंद केले आहे. सुनील पवार यांच्या या संशोधनाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली. त्यांनी सुनील पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली.

पंजाबराव डख यांचं ऐकलं अन्… : नुकसानग्रस्त शेतकरी संतप्त; कथित हवामान तज्ञ पुन्हा तोंडघशी 

सुनील पवार यांनी संशोधन केलेल्या या पावडरचा व त्यांनी वापर केलेल्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी कृषी विद्यापीठातील तज्ञांची एक टीम पुढील आठवड्यात जळगाव जिल्ह्यात जाणार आहे. या टीमचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.

मका व अनेक दिवस पाणी आपल्यात साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या अन्य काही जैविक घटकांना एकत्र करून ही जैविक पावडर बनवण्यात आली असून दीड ते दोन महिने पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या जैविक पावडरमध्ये आहे. त्यामुळं कमी पावसाच्या किंवा दुष्काळी भागात ही पावडर शेतीला वरदान देणारी ठरणार असल्याचा दावा सुनील पवार यांनी केला आहे.

पेरणीपासून ते पिकांना पाणी देण्यापर्यंतच्या काळात देखील सुनील पवार यांनी संशोधन केलेली जैविक पावडर दीड ते दोन महिने पाणी नसले तरी पिकांना जगवू शकते, हा प्रयोग पू्र्णपणे यशस्वी झाला तर शेती क्षेत्रात क्रांती घडवणारा हा निर्णय ठरेल, तसेच दुष्काळी व अवर्षणग्रस्त भागात देुखील ही पावडर एक प्रकारचे वरदान ठरणार आहे. म्हणूनच चाळीसगावर जि. धुळे येथे आम्ही लवकरच कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची एक टीमि सुनील पवार यांच्या भेटीला पाठवत आहोत. या टीमचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं.

 

Tags

follow us