Download App

स्वतःच्या इच्छेने धर्मांतर होत असलं तरी.. सरसंघचालक मोहन भागवत यांचं धर्मांतरावर मोठ वक्तव्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूर येथे कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय)चं आयोजन केलं होतं. दोन दिवस चालणाऱ्या या वर्गाचा काल

Mohan Bhagwat : आपल्या सुरक्षेसाठी आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे. (Rss) त्यासाठी आपलं सैन्य, शासन-प्रशासन आणि समाजाचं बळ असणं आवश्यक आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईने देशाचं संरक्षण आणि संरक्षणात्मक सामर्थ्याची क्षमता सिद्ध झाली आहे. या निमित्ताने शासन आणि प्रशासनातील दृढता सुद्धा दिसली आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. तसंच, स्वइच्छेने केलेल्या धर्मांतराला आक्षेप घेऊ नये, असं मोठं विधान त्यांनी केलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूर येथे कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय)चं आयोजन केलं होतं. दोन दिवस चालणाऱ्या या वर्गाचा काल समारोप झाला. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद नेतामही उपस्थित होते. तसंच, मंचावर विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, वर्गाचे सर्वाधिकारी समीर कुमार महांती आणि नागपूर महानगर संघसंचालक राजेश लोया उपस्थित होते. यावेळी मोहन भागवत यांनी हे महत्त्वाचं विधान केलं.

जो पर्यंत हिंदू बलवान होत नाही तोपर्यंच जगात; पहलगामनंतर हिंदूंच्या सुरक्षेवर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

पहलगाममध्ये झालेल्या नृशंस हल्ल्यानंतर देशभरात आक्रोशाची लाट होती. गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी ही लोकांची अपेक्षा होती. हा हल्ला करणाऱ्यांवर आपण कठोर कारवाई केली सुद्धा. ही कारवाई करताना देशाच्या संरक्षणात्मक सामर्थ्याची क्षमता सिद्ध झाली. यावेळी शासन आणि प्रशासनाचा निर्धारही पाहिला. संपूर्ण समाजात अभूतपूर्व एकतेचं वातावरण दिसलं. राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकमेकांना साथ देण्याचं काम केलं. देशभक्तीच्या वातावरणात आपण आपले सर्व मतभेद बाजूला ठेवले. देशाचं हे चित्र चिरस्थायी राहिलं पाहिजे. पण या कारवाईनंतरही समस्या संपलेली नाही. संकट अजून कायम आहे, असं मोहन भागवत म्हणाले.

Video : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार; मनसे अन् शिवसेना युतीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

अजूनही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. द्विराष्ट्रवादाचं भूत कायम आहे. दहशतवाद आणि सायबर युद्धाचा आधार घेऊन प्रॉक्सी वॉर सुरू आहे. युद्धाचे प्रकार बदलत आहेत. त्यामुळेच आता जगातील इतर देशांचीही परीक्षा होत आहे. सत्यासोबत कोण उभं राहतो आणि कोण स्वार्थी आहे, याचीही परीक्षा झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला आपल्या संरक्षणासाठी आत्मनिर्भर झालं पाहिजे. शासन आणि प्रशासनाने त्या दिशेने पावलं उचलली पाहिजे. त्यासाठी समाजशक्तीने दृढतेने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, असं मत भागवत यांनी व्यक्त केलं.

देशाच्या समोरील संकट पाहिले असता समाजाने एकतेने मजबूत होणं आवश्यक आहे. आपला देश विविधतेने नटलेला आहे. देशात अनेक समस्या आहेत. अनेकदा तर एकाची समस्या दुसऱ्याला माहीतही नसते. या सर्व प्रश्नांचा निर्णय घेणे कठिण होतं. पण समाजात संघर्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सद्भावना कायम राहिली पाहिजे. अनावश्यक वाद-विवाद निर्माण होऊ नयेत. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न योग्य नाही. तसेच आपल्या स्वार्थासाठी समाजात भेद निर्माण करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नये. एक दुसऱ्यांच्या बाबत सद्भावना, सद्विचार आणि सहकार्य असलं पाहिजे.

विकास आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी एकत्रित राहू शकतात. आदिवासी हे आपलेच बांधव आहेत. ते आपल्या समाजाचाच एक भाग आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या आपण निश्चितपणे शासनापुढे मांडणार आहोत. त्यासाठी आमची एक कार्यपद्धती आहे. शासन आपलं काम करेल. स्वतःच्या इच्छेने केलेल्या धर्मांतराला कोणताही आक्षेप नसावा. पण जबरदस्ती, आमिष दाखवून किंवा फसवून धर्मांतर होऊ नये. आम्ही कोणत्याही पंथाच्या विरोधात नाही. जबरदस्तीने धर्मांतरित झालेले लोक जर स्वधर्मात परत यायचे ठरवत असतील, तर त्याचे स्वागतच आहे. संघ आणि समाज एकत्र येऊन नक्षलवाद आणि धर्मांतराच्या समस्येचं निराकरण करू शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

follow us