Download App

राहुल कुल, दादा भुसे, किरीट सोमय्या यांच्या घोटाळ्याचे पुरावे द्यायचे आहेत, राऊतांचे फडणवीसांना पत्र

  • Written By: Last Updated:

“महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती. बाजार बुणगे सरकारात आहेत.आपल्या सोबत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणारं?” असा प्रश्न विचारत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहले आहे.

परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा यांची लगीनघाई, ‘अशी झाली तयारी’

संजय राऊत यांनी आपल्या जाहीर पत्रात देवेंद्र फडणवीस भेटीसाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोपही केला आहे. सोबत त्यांनी भाजप आमदार राहुल कुल, मंत्री दादा भुसे आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधातील पुरावे द्यायचे आहेत. त्यासाठी भेटीसाठी वेळ द्या, असा खोचक टोला देखील लगावला आहे.

नक्की काय म्हणले आहे पत्रात ?

संजय राऊत यांनी पत्राच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच कौतुक करत त्याना खोचक टोला लगावला आहे. सुरुवातीला त्यांनी लिहले आहे की, आताच (१ एप्रिल) मी आपले एक विधान ऐकले व गृहमंत्री म्हणून आपला अभिमान वाटला. आपण म्हणता, “मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करणार म्हणजे करणार!”

पुढे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारला आहे. ते म्हणालेत की, देवेंद्रजी, आपण घेतलेल्या या भूमिकेबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच, पण आपण जे बोलत आहात तसे महाराष्ट्रात खरोखरच घडते आहे काय? आपल्या सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये व लांड्यालबाड्या याबाबत करवाई करण्याबाबत मी आपल्याकडे पुराव्यांसह येऊन भेटू इच्छितो. गेल्या चार महिन्यांपासून आपण मला याबाबत भेट देण्यास टाळाटाळ करीत आहात.

Devendra Fadnavis ; महात्मा गांधींच्या सुचनेवरुन सावरकरांनी ‘ते’ पत्र लिहिले

राहुल कुल, दादा भुसे आणि सोमय्या

आपल्या पत्रात त्यांनी राहुल कुल, दादा भुसे आणि किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत आणि त्याच्या विरोधातले पुरावे द्यायचे आहेत अशी मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

१) भाजपचे आमदार सन्माननीय श्री. राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात (ता. दौंड) प्रचंड भ्रष्ट्राचार झाला आहे. शेतकऱ्यांच्या पैशाची अक्षरशः लुटमार झाली असून किमान ५०० कोटींचे मनीलाँडरिंग झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. संबंधित कारखान्यांचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मी आपली या बेकायदेशीर प्रकरणावर कारवाई व्हावी म्हणून भेट घेऊ इच्छितो.

२) आपल्या मंत्रिमंडळातील श्री. दादा भुसे (मालेगाव) यांनी ‘गिरणा अँग्रो’ नावाने १७८ कोटींचे २५ लाख डोअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. गिरणा कारखाना वाचविण्यासाठी श्री. भुसे यांनी हे पैसे गोळा केले. या रकमेचा अपहार झाला असून कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स फक्त ४७ शेतकऱ्यांच्या नावावर दाखवले. या अश्रा भ्रष्टाचारी कृत्याबाबत कोणालाही पाठीशी न घालण्याचे आपले धोरण असायला हवे. व त्या भ्रष्टाचाराबाबत मी आपणास अधिक माहिती देऊ इच्छितो.

राऊत, फाऊत, दाऊद म्हणत Devendra Fadanvis यांची ठाकरे, राऊतांवर तुफान हल्ला

३) किरीट सोमय्या यांनी ‘विक्रांत’ युद्ध नौका वाचविण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केले. त्याचाही हिशोब दिलेला नाही. उलट राज्यात तुम्ही गृहमंत्री होताच मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी थांबवून सोमय्या यांना ‘क्लीन चिट’ दिली हे धक्कादायक आहे. अशा सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतेच्या पैज्ञांवर सुरू असलेली दरोडेखोरी थांबवावी, अशी माझी विनंती आहे.

Tags

follow us