Download App

Maharashtra Politics : संजय राऊतांना शहाजीबापू पाटलांचा विषारी टोला…

सोलापूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नागापेक्षाही विषारी असल्याचा टोला शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांनी लगावला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर संजय राऊतांनी 2 हजार कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.

शहाजीबापू पाटील म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर 2 हजार कोटींचा व्यवहार झाल्याचा दोन हजार कोटींचा व्यवहार झाला, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. संजय राऊतसारख्या माणसाने, असं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हंटलंय.

भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही.., Uddhav Thackeray यांचा घणाघात

तसेच निवडणूक आयोग ही देशातली स्वायत्त संस्था आहे. संजय राऊतांची मानसिकता बिघडली आहे. राऊत सध्या लोकशाही बिघडवण्याचं काम करत असल्याचा आरोपही पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.

अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशात भूकंपाचे धक्के

राऊत जे सध्या करीत आहेत ते महाराष्ट्राला शोभणारं नसून ते नागापेक्षाही विषारी फुस्कार त्यांच्या तोंडातून टाकत असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. त्यांच्या या विधानाला जनता कोणतीही भीक घालणार नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलंय.

Sambhajiraje Chatrapati : व्हीआयपी लोकांसाठी शिवभक्तांना का अडवता?

दरम्यान, राज्यात सध्या सत्तासंघर्षाच्या वाद उफाळून आला असून निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी धुमश्चक्री झाल्याचं पाहायला मिळतंय. अशातच दोन्ही गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरु आहे.

Tags

follow us