Download App

…अन्यथा मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल; शरद पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

दुष्काळाची परिस्थिती कठीण झाली असून त्याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे. अन्यथा आपम भूमिका घ्यावी लागेल असं पत्र पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहलय

Image Credit: Letsupp

Sharad Pawar Letter To CM Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलं आहे. यामध्ये त्यांनी दुष्काळाबद्दल राज्य सरकारला आठवण करून दिली आहे. (Sharad Pawar) दुष्काळाबाबत सरकारने कुठलीच भूमिका घेतली नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. (CM Eknath Shinde) तसंच, सातत्याने पाठपुरावा करूनही सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे आता मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही पवारांनी या पत्राच्या माध्यमातून राज्य सरकारला दिला आहे.

योग्य कार्यवाही करावी    दुष्काळाचा दाह : टँकरच्या पाण्यावर भागतेय तहान, धरणेही खपाटीला ! जायकवाडीत किती पाणीसाठा ?

राज्यात सध्या दुष्काळासारखी स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाण्याच्या टंचाईमुळे लोकांना रोज वणवण करावी लागत आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचं लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही, असं शरद पवार म्हणाले. जर ही दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत, तर महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळ निवारणाबाबत योग्य कार्यवाही करावी अशी मागणी पवारांनी केली आहे.

लोकप्रतिनिधींसह मंत्री गैरहजर

मी मागील महिन्यात दिनांक 24 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडं राज्य सरकारचं लक्ष वेधलं होतं. त्या पत्रकार परिषदेते मी राज्य सरकारशी सहकार्य करण्याची आणि दुष्काळी परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची भुमिका घेतली होती. आपणही आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र, ह्या महत्वपुर्ण बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधींसह मंत्री गैरहजर होते. आपण सदर बाबीची योग्य ती दखल घेतली असेलच. मात्र, राज्य सरकार अद्यापही अंग झटकून कामाला लागल्याचं दिसत नाही हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो, असही पवार म्हणाले आहेत.

पाणी टंचाई चिंताजनक  Lok Sabha Election 2024 Result : सर्वात जलद निकाल, पहा फक्त लेट्सअप मराठीवर

मागील दहा दिवसांत दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यातील उजनी, जायकवाडी सारखी महत्वाची धरणे आटली आहेत. संपुर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ बाजूच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ विभागाला देखील बसली आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगांव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी तहानलेली आहे. मराठवाडयासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी ह्या तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.

पवार काय म्हणाले

मागील वर्षी राज्यात केवळ अकराशे टँकर होते. सध्या ती संख्या 11 हजारांच्या वर गेली असून टँकरसाठी पाणी भरण्याचे स्त्रोत शोधावे लागत आहेत. जनावरांना चारा आणि पाणी मिळणं कठीण झालं असून, राज्यातील पशूधन धोक्यात आले आहे. पाण्याअभावी फळबागांची परिस्थिती बिकट झाली असून, राज्यशासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचं दिसत नाही. दुष्काळ निवारणाच्या योजना तळागळापर्यंत पोहोचल्या नाहीत. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत. हे दुर्दैवाने नमूद करावंसं वाटतं. दुष्काळी परिस्थिती हाताळताना मी राज्य सरकारशी सातत्याने सहकार्याची भुमिका घेत आलो आहे. परंतु, या भीषण दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पाहून स्वस्थ राहणं कठीण झालं आहे. दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकारने तातडीनं पावलं उचलावीत असं मी आवाहन करतो. मात्र, त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिसल्यास मला संघर्षाची भुमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे नमूद करतो असंही पवार म्हणाले आहेत.

follow us

वेब स्टोरीज