Download App

शिंदे-फडणवीसांचा अर्थसंकल्प हा गाजर हलवा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी सादर केला. दरम्यान, यावर आता विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांना हा अर्थसंकल्प चुनावी जुमला असल्याचं सांगितलं. तर उद्धव ठाकरे यांनीही या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा अर्थसंकल्प गाजर हलवा असल्याची खोचक टीका केली आहे. विधानसभेचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर ठाकरेंनी माध्यमांशी बोलत असतांना ही टीका केली आहे.

आज विधिमंडळात शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकप्ल सादर झाला. या अर्थसंकल्पात फडणवीस यांना अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. मात्र, विरोधकांनी शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात आम्ही 2-3 वेळा अर्थसंकल्प सादर केला. तेव्हा कोरोनाचं संकट होतं. शिवाय, केंद्र सरकारही आमच्या बाजूचं नव्हतं. त्यामुळए कधीही मागणी केली तरी आमची पंचवीस हजार कोटीहून जास्त GST थकबाकी असायचा. आता या सरकारला महाशक्तीचा पाठिंबा आहे. त्यामुळे हे सरकार जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प सादर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या अर्थसंकल्पाने अपेक्षा भंग केल्याचं त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले, मी आजच काही औरंगाबाद जिल्ह्याती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बोललो. अजूनही त्यांच्या बांधावर पंचनामा करण्यासाठी शासन गेलं नाही. याउलट या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना मधाचं बोट लावण्याचा आणि त्यांच्या भावनांशा खेळण्याचा प्रयत्न झाल्याची टीका त्यानी केली.

Budget Session 2023 : हा तर ‘चुनावी जुमला’ अर्थसंकल्प, अजित पवारांची सडकून टीका

हा गाजर हलवा अर्थसंकल्प आहे. अवकाळी पाऊस महाराष्ट्रात झाला. गरजेत तो पडेल काय, असं म्हणतात. तसाच हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा गडगडाट आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अनेक योजना नाव बदलून सादर केल्या आहेत, जी योजा आम्ही मुंबईत सुरू केली, ती बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याोजना ही राज्यभर राबवण्यात येणार आहे, अशा शब्दात त्यांना सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली. दिपक केसरकरांनी अर्थसंकल्पात पंतप्रधान मोदीचा उल्लेख केला आहे. मोदींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल, अशी घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात वास्तव काही वेगळचं असल्याची टीका ठाकरेंनी केली.

Tags

follow us