Sanjay Raut Criticize Mahayuti Government : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. राऊत यांनी म्हटलंय की, महायुती (Mahayuti) सरकारमध्ये शिक्षण, कृषी यांसारखी चांगली खाती कोणालाही नको. सर्वांचं लक्ष मलाईदार खात्यांकडे आहे. नेत्यांना नगरविकास सारखी खाती हवी आहेत. मंत्री गांभीर्याने कृषी खाते सांभाळण्यास तयार नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. मंत्र्यांना कृषी खाते, शिक्षण खाते शिक्षा वाटत असल्याचा हल्लोबोल (Maharashtra Politics) संजय राऊत यांनी केली आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की, देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्रात त्यांनी मोदी फॉर्म्युला आणला असून त्यांनी पीए पीएससाठी देखील चाचणी घेतली. धुळ्यात शासकीय विश्रामगृहात मिळालेल्या रक्कम प्रकरणामध्ये अनिल गोटे यांनी हे उघड केलं. सर्वांनी एकनाथ शिंदे यांचा कचरा केला. परवा सर्वोच्च न्यायालयामध्ये तीन हजार कोटींचे लाच प्रकरण समोर आलंय. कचऱ्यापासून चिखलापर्यंत सर्वांचे पैसे खात आहेत, त्यातूनच हे सरकार निर्माण झालं असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
पुण्यात शरद पवारांचा राज ठाकरेंना धक्का; 100 कार्यकर्त्यांचा मनसेला जय महाराष्ट्र!
राऊत यांनी म्हटलंय की, एकनाथ शिंदे मागे मुख्यमंत्री होते. आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत. या दोन्ही नेत्यांचं सरकार आल्यापासून लोकांच्या मनामधील कायद्याची भीती संपली आहे. राज्यात अमानुषता वाढली असून सरकार देखील क्रूर आहे. पैसे देऊन आपण कायदा मोडू शकतो, असं लोकांना वाटू लागलं आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाचा संदर्भ घेत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय.
भारतविरोधी अफरीदीचं दुबईत जोरदार स्वागत; केरळच्या ‘त्या’ ग्रुपनं मागितली माफी, Video व्हायरल
संजय राऊत यांनी म्हटलंय की, एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या मंदिरात गेले होते. त्यानंतर राज्यातील अनेक लोक तिथे जायला लागले. अनेकांच्या हातामध्ये कोंबड्या, बकरे असतात. हा प्रकार पाहून धक्का बसल्याचं देखील राऊत यांनी म्हटलंय. प्राण्यांचे बळी देऊन पूजा केली जाते, हा विचित्र प्रकार असल्याची टीका त्यांनी केली आहे. यासंदर्भात पुजाऱ्यांना विचारलं असता, ते म्हणाले काही वर्षांपूर्वी येथे शिवसेनेचे लोक आले होते, तेव्हा सर्वाधिक बळी चढवले, आम्हाला सुद्धा चांगली दक्षिणा मिळाली.