Download App

‘त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाहीच; नार्वेकरांच्या खेळीवर ठाकरेंचे खासदार भडकले

Arvind Sawant : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्याकडून आता ठाकरे आणि शिंदेंना नोटीसा पाठवल्या जाणार असल्याचे समजते. मात्र या सगळ्याच प्रकरणात विलंब झाल्याने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. आता ठाकरे गटाचे नेतेही राहुल नार्वेकर यांच्यावर भडकले आहेत. सत्तेसाठी कुठेही जाणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा नाही. अध्यक्षांना दिरंगाई शोभणारी का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) उपस्थित केला. राजधानी दिल्ली येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नार्वेकर यांच्यावर घणाघाती टीका केली.

महिला आरक्षण हा जुमला, आजही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असे मंत्री…; आदित्य ठाकरेंची राज्यासह केंद्रावर टीका

ते पुढे म्हणाले, शहाण्याला शब्दांचा मार. सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. पण, अजूनही डोळे उघडले नाहीत. आधीच त्यांनी हजार पक्ष बदलले आहेत. सरड्यासारखा रंग बदलणारे ते आहेत. त्यामुळे न्याय, अन्याय, विचारांची बांधिलकीचे अशा लोकांना काहीच देणेघेणे नसते, अशी टीका सावंत यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यास उशीर होत असल्याने सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले होते. त्यामुळे आता या प्रकरणाचा निकाल लवकर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या निर्णयानंतर काल राहुल नार्वेकर यांनी तडक दिल्ली गाठली. महाधिवक्ता तुषार मेहता यांच्याशी चर्चा करण्यासाठी नार्वेकर दिल्लीला गेले आहेत. यामुळे या प्रकरणात आता वेगाने घडामोडी घडू लागल्या असून लवकर निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

आमदार अपात्र होणार म्हणूनच राहुल नार्वेकरांची चालढकल; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप

शिंदे अपात्र ठरल्यास नवा CM कोण?

विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवलेच तर सरकार वाचविण्यासाठी भाजपने प्लॅन बी तयार केला आहे. शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून पहिला पर्याय असतील. याव्यतिरिक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही नावे चर्चेत आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतरच यासंबंधी काहीतरी घडेल. त्यामुळे पुढील काही दिवसात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Tags

follow us