Devendra Fadnavis replies Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी मागील (Rahul Gandhi) काही दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2025) मतदार याद्यांत घोळ झाल्याचा आरोप करत आहेत. मतदानाच्या शेवटच्या काही तासांत मतदानाची आकडेवारी अनाकलनीय पद्धतीन वाढली असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मतदारसंघात पाच महिन्यांत आठ टक्के मतदार अचानक वाढल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या याच दाव्याला आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ज्या मतदारसंघात मतदार वाढले त्या ठिकाणी काँग्रसचे उमेदवार जिंकले, असे फडणवीस यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात मतदानाच्या आधीच्या पाच महिन्यात आठ टक्के मतदार वाढले असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. मतदानाच्या दिवशी अनेक बूथवर अचानक 20 ते 50 टक्के मतदार वाढले होते. यासंदर्भात त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली होती. या पोस्टसोबत न्यूजलॉन्ड्री या वेबसाइटवरील काही माहिती शेअर केली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात शेवटच्या पाच महिन्यांत आठ टक्के मतदार वाढले होते. काही बूथवर 20 ते 50 टक्के मतदार वाढले असा दावा त्यांनी केला होता.
अजितदादांच्या ‘अर्थ’ खात्यावर राहणार शिंदेंच्या शिवसेनेचा वॉच; एकनाथ शिंदेंचे आमदारांना आदेश?
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक फेसबूक पोस्ट लिहित उत्त दिलं. त्यांनी या पोस्टची सुरुवात एका हिंदी गाण्यानं केली. झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो.. राहुल गांधी, महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानं तुमच्या वेदना दिवसेंदिवस वाढत आहेत मान्य आहे. पण आणखी किती काळ हवेत तीर मारणार? तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो महाराष्ट्रातील 25 मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात सरासरी 8 टक्के मतदार वाढले आहेत.
यातील अनेक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. पश्चिम नागपूर मतदारसंघात 7 टक्के मतदार (27065) वाढले आणि या ठिकाणी काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी झाले. उत्तर नागपुरात 7 टक्के (29348) मतदार वाढले या ठिकाणी काँग्रेसचे नितीन राऊत विजयी झाले. पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरीमध्ये 10 टक्के (50911) मतदार वाढले आणि या ठिकाणी शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले.
मालाड पश्चिम मतदारसंघात 11 टक्के (38625) मतदार वाढले या ठिकाणी काँग्रेसचे अस्लम शेख विजयी झाले. मुंब्रामध्ये 9 टक्के (46041) मतदार वाढले या मतदारसंघात शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले. सहकारी पक्षांचं नाही किमान तुमच्या पक्षाचे अस्लम शेख, विकास ठाकरे, नितीन राऊत यांच्याशी ट्विट करण्याआधी किमान बोलायचं तरी होतं. किमान संवादाच्या अभावी काँग्रेस पक्षाची इतकी खराब कामगिरी तरी झाली नसता असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
बच्चू कडूंना दिलासा! अमरावती बँक अध्यक्षपद अपात्रतेच्या निर्णयाला न्यायालयाची स्थगिती