Download App

IND vs AUS Final : धक्कादायक! भारताचा पराभव अन् मटणाचा संबंध जोडत लहान भावाचीच केली हत्या

  • Written By: Last Updated:

IND vs AUS Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND VS AUS Final ) ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव> केला. त्यानंतर खेळाडूंसह 140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले. त्यात अनेकांच्या भावनिक प्रतिक्रिया आल्या. त्यात अनेकांना रविवारी रात्री जेवण गेलं नाही. तर काही भारतीय संघाच्या पराभवानंतर अक्षरशः ढसा ढसा रडले. त्या दरम्यान याच रागातून एक धक्कादायक घटना घडली. ता म्हणजे भारतीच संघाच्या पराभव झाला म्हणून मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावाची हत्या केली आहे.

…म्हणून लहान भावाचीच केली हत्या

सर्वत्र भारतीय संघ विश्वचषकात हारल्याचं दुखः व्यक्त केलं जात असताना. अमरावती जिल्ह्यामध्ये भारतीय संघ हारला म्हणून दोन भावांमध्ये वाद झाला. त्यात मोठ्या भावाने आपल्या लहान भावावर आणि वडिलांवर आरोप केला की, तुम्ही मटण खाऊन आले म्हणूनच भारतीय संघ हारला. त्यात हा वाद विकोपाला गेला तेव्हा मोठ्या भावाने लहान भाऊ आणि वडिलांवर लोखंडी सळईने वार केले.

Emmy Awards: आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार गमावल्यानंतर जिम सरभ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

यामध्ये लहान भाऊ अंकीत इंगोले (28 वर्षे) याचा मृत्यू झाला आहे. तर वडिल रमेश इंगोले हे गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिस तात्काळ तेथे दाखल झाले. त्यांनी या मोठ्या भावाला म्हणजे प्रवीण इंगोले याला अटक केली आहे. दरम्यान घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

Maratha Reservation : कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेला मराठा समाजाचा विरोध; मुख्यमंत्री म्हणाले…

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. सामना गमावल्याचे दुःख खेळाडूंच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होते. कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अश्रू अनावर झाले. अंतिम सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्मा भावनिक झाल्याचं दिसून आलं. स्पर्धेतील सगळ्या सामन्यात भारताने जबरदस्त खेळ करत विजय मिळवला. अंतिम सामन्यात मात्र तशी कामगिरी करता आली नाही. निराशाजनक कामगिरीचे फळ पराभवाच्या रुपात मिळाले.

Tags

follow us