Download App

…तर आरक्षणाचं औचित्य संपून जाईल; संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाड यांचं मोठं विधान

मराठा, ओबीसी, एससी, एसटी या सगळ्यांनी आरक्षणावरुन एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकत्र आले पाहिजे आणि महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे.

  • Written By: Last Updated:

Pravin Gaikwad On Maratha Reservation : एकीकडे मराठा आणि कुणबी आरक्षणावरून राजकारण तापलेले असतानाच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि मराठा नेते प्रवीण गायकवाड यांनी मोठं विधान केले आहे. मराठा समाजाच्या समस्या आरक्षणाने सुटू शकत नाहीत. जर खुल्या वर्गातील लोक आरक्षणात (Maratha Reservation) आले तर आरक्षणाचं औचित्य संपून जाईल, असे मत प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सरकार धनगर, मराठा अन् ओबीसी समाजाला फसवतंय; शशिकांत शिंदेंचा आरोप…

माफक दरात शिक्षण अन् सरकारी नोकरीसाठी आरक्षणाची मागणी

मराठा आणि ओबीसी समाज आरक्षण का मागत आहेत तर त्यांना माफक दरात शिक्षण मिळावं आणि सरकारी नोकरी मिळावी. पण आता सरकार नोकरभरती करत नाही. खासगी कंपन्यांमध्येही फारशा नोकऱ्या उरलेल्या नाहीत. ही समस्या वेगळी आहे. पण अनेकांना त्यावर आरक्षण हा शाश्वत मार्ग आहे, असे वाटत असल्याचे प्रविण गायकवाड म्हणाले.

या समस्येव आरक्षण हे उत्तर असे वाटत नाही

महाराष्ट्र धर्म हा जपणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही पुढील काही काळात लोकांमध्ये जाऊन आमचे म्हणणे मांडणार आहोत. आमचे सर्व लक्ष्य हे महाराष्ट्र धर्मावर असेल, असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले. मराठा आरक्षणावर माझा स्वत:चा 25 ते 30 वर्षांचा अभ्यास आहे. शिक्षण महागल्यामुळे आणि बेरोजगारीच्या समस्येमुळे काही प्रश्न उद्भवले आहेत. या समस्येवर फक्त आरक्षण हे उत्तर आहे, असे मला वाटत नाही, असेही ते म्हणाले. सध्याच्या नेत्यांनी भाषेची मर्यादा पाळली पाहिजे. नेत्यांच्या भाषेमुळे समाजात द्वेष पसरत चालला आहे. नेत्यांनी जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवता कामा नये. पण अलीकडे नेत्यांच्या भाषेमुळे समाजात द्वेष पसरत चालला आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी राज्यभरात कार्यक्रम घेणार आहोत.

तुम्ही सांगा तिथं येतो..,; आरक्षणाच्या जीआरवरुन रोहित पवार मंत्री विखेंना भिडले

न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनाही विचारलेला प्रश्न 

1 जून 2004 मध्ये खत्री कमिशनने कुणबीमध्ये ‘मराठा कुणबी’, ‘कुणबी-मराठा’ समावेशाला मान्यता दिला. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मराठा जात ही तेव्हा ओबीसीत गेली आहे. त्यानंतर आम्ही सरसकट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केले. त्यावेळी मी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांना मराठा समाजाला आरक्षण मिळणे शक्य आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर ‘ज्या समुदायापासून संरक्षण पाहिजे तेच आता आरक्षण मागत आहेत. जर सगळ्या समाजांना आरक्षण दिलं , मग आरक्षणाचं औचित्य संपून जाईल. त्यामुळे खुल्या वर्गातील लोक आरक्षणात आले तर, त्याचा उद्देशच संपून जातो’, असे न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी सांगितल्याचेही यावेळी गायकवाड म्हणाले.

ऑन हैदराबाद गॅझेट

या गॅझेटमध्ये फक्त नोंद आहे, हैद्राबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यातील कुणबी समाजाची नोंद आहे. मात्र तिथून पूढचा प्रवास सर्टिफिकेट मिळण्याचा प्रवास अवघड आणि जटील आहे. सर्टिफिकेट मिळणार मात्र कास्ट व्हिलिडिटी मिळणं अवघड असल्याचे ते म्हणाले. हे प्रकरण कोर्टात गेल्यावर टिकणार का हे समजणार असल्याचेही यावेळी प्रविण गायकवाड यांनी सांगितले.

follow us