Shaktipeeth Expressway : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध वाढू लागला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) महामार्गासाठी भूसंपादनास मंजुरी देण्यात आली होती. यानंतर शेतकऱ्यांचा पारा वाढला आहे. आज राज्यात काही ठिकाणी शेतकरी आणि ग्रामस्थांच्या संतापाचा भडका उडाला. नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी (Nanded News) यासंबंधीच्या सरकारी आदेशाची होळी केली तर सांगलीत शेतकऱ्यांनी (Sangli News) महामार्गाच्या मोजणीचं काम बंद पाडलं.
या महामार्गासाठी डोंगर पोखरून बोगदे तयार केले जाणार आहेत. अनेक ठिकाणी भर टाकून नद्या नाले बुजवले जाणार आहेत. सध्याच्या जमिनी या शेतकऱ्यांचे जगण्याचे एकमेव साधन आहे. आता जमिनी संपादित केल्या तर शेतकरी अल्पभूधारक किंवा भूमीहीन होऊ शकतो. यातील काही जमिनी बागायती आहेत. विमानतळ, रेल्वे स्टेशन, रेल्वे कोच कारखाना, साखर कारखाना, एमआयडीसीपासून जमिनी जवळच आहेत. त्यामुळे या जमिनींचे मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे. आता जर महामार्गासाठी या जमिनी संपादित झाल्या तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता; मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
शक्तीपीठ महामार्ग नागपूर आणि गोवा या दोन शहरांना जोडणारा आहे. हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्गमार्गे गोव्याला जाणार आहे. या महामार्गासाठी भूसंपादनास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या महामार्गासाठी अनेक सुपीक जमिनी जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला आहे. नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे शेतकऱ्यांनी सरकारी आदेशाची होळी केली. या आंदोलनात परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले होते.
सांगली जिल्ह्यातही या महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झाले होते. आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे काम रोखून धरले. त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. काही मोजक्या लोकांच्या हितासाठी हा महामार्ग शेतकऱ्यांवर लादण्यात येत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केली.
Navratri 2023 : दुसऱ्या माळेनिमित्त साडेतीन शक्तीपीठातील दुसऱ्या पीठाची महती जाणून घ्या