अहिल्यानगर : मुसळधार पावसामध्ये नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यावर (Ramshej Fort) खा. निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या नेतृत्वाखाली हजारो मावळ्यांनी स्वच्छता मोहिम तसेच वृक्षारोपण मोहिम राबविली. पावसाची तमा न बाळगता मावळ्यांनी ही मोहिम यशस्वी केली. हजारो मावळ्यांच्या उपस्थितीत रामशेज किल्ला फुलला होता.
सर्वात मोठी बातमी, इराणकडून अमेरिकेला प्रत्युत्तर; लष्करी तळावर हल्ला
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी येथील रामशेज किल्ल्यावर या महिन्यातील गड-कोट संवर्धन व स्वच्छता मोहिम रविवार (दि.२२ जुन) रोजी राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये खा. निलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिंडोरीचे खा. भास्कर भगरे, नाशिकचे खा. राजाभाऊ वाजे, आमदार सुनील भुसारा, औरामा शेटे, दत्तात्रय पाटील, कोंडाजी आव्हाड, उदय सांगळे, नाना पिंगळे, पुरूषोत्तम पिंगळे, डॉ. योगेश गोसावी, पराग भगरे यांच्यासह मोठया संख्येने नागरीक या मोहिमेत सहभागी झाले होते. सुर्या अकादमीच्या युवकांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवत स्वच्छता तसेच वृक्षारोपण केले.
पोलीस असल्याची बतावणी करून घातला 50 लाखांचा गडा, 5 आरोपींना अटक
या मोहिमेअंतर्गत गडावर पाच ते सहा फुट उंचीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. किल्ल्यावर सोलर दिवे, स्वागत कमान, स्वच्छता राखण्यासंदर्भातील सुचना फलक, कचरा कुंड्या, बसण्यासाठी बाके बसविण्यात आले.
या उपक्रमाबाबत बोलताना खासदार भास्कर भगरे म्हणाले की, इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन व जतन होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी खासदार निलेश लंके यांनी हाती घेतलेला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे. ही मोहिम अशीच पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.
ऐतिहासिक वास्तूच्या सेवेचा आनंद
छत्रपती संभाजी महाराजांशी जोडले गेलेले इतिहासातील एक सुवर्णपान किल्ले राजशेजच्या लढाईला वाहिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळयांनी तब्बल ६५ महिने हा किल्ला झुंजत ठेवला होता. स्वराज्याच्या प्रेरणेने स्फूरलेल्या या ऐतिहासिक वास्तूची आपल्या हातून सेवा घडली याचा आनंद आहे.
– आ. जयंत पाटील
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
जबरदस्त, शानदार ‘या’ संघाने रचला इतिहास; सलग पाच विजय अन् T20 World Cup 2026 साठी पात्र
युवा वर्ग मोहिमेला प्रतिसाद देतोय
मला खात्री आहे की महाराष्ट्रातील युवा वर्ग या मोहिमेला प्रतिसाद देतोय, खा. लंके यांचा हा प्रयोग यशस्वी होईल. राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी तसेच खा. भास्कर भगरे यांच्यासह राष्ट्रवादीचे या भागातील सर्व कार्यकर्ते या मोहिमेत हिरीरीने सहभागी झाले आहेत. मोठा पाऊस असतानाही मावळे या मोहिमेत सहभागी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहताना इथली व्यवस्था चांगली आहे याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
शिवरायांच्या ठेव्यांकडे सरकारचे दुर्लक्ष
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय राजकारण होत नाही, मात्र त्यांचा जो ठेवा आहे त्याकडे दुर्लक्ष होते काय या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, शिवरायांच्या ठेव्यांकडे दुर्लक्षच झालेले आहे. म्हणूनच ही मोहिम हाती घेण्याची वेळ खा. निलेश लंके व आमच्या सगळयांवर आली आहे, असं ते म्हणाले.
वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही
या मोहिमेस शिवमावळयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पहावयास मिळाला याचे समाधान आहे. गड-किल्ले सुरक्षित राहीले पाहिजेत, तिथे स्वच्छता झाली पाहिजे. आमचा हा उपक्रम ही एक ठिणगी आहे, त्यातून वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. या मोहिमेचा गड किल्ले संवर्धनासाठी फायदा होईल असा विश्वास खा. निलेश लंके यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजीराजांची सेवा
इथे स्वच्छता केल्यानंतर वेगळे समाधान मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपण राजकारण, समाजकारण करतो. राजांचे नाव घेतल्याशिवाय आपले काहीही चालत नाही. आपल्याला प्रत्यक्ष राजांची सेवा करताना आली नाही, परंतू त्यांनी जे गड किल्ले उभे केले त्याचे संवर्धन करणे, स्वच्छता करणे हे राजांची सेवा करण्यासारखेच आहे, असं लंके म्हणाले.
खासदार द्वयींचा शाळेत मुक्काम
खा. निलेश लंके व त्यांचे सहकारी शनिवारी रात्रीच रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचले. ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. आशेवाडी येथील माध्यमिक विद्यालयात सर्व कार्यकर्त्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली होती. खा. नीलेश लंके हे देखील माध्यमिक शाळेतील खोलीतच झोपले. खासदार भास्कर भगरे यांनीही कार्यकर्त्यांसोबत शाळेतच मुक्काम केला.