Download App

मोदींनी कोविडची लस तयारी केली मग संशोधक काय….उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

  • Written By: Last Updated:

ठाकरे गटाच्या शिवसेना मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकार, राज्य सरकावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोविडची लस पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तयार केल्याचे फडणवीस सांगतात. मग संशोधक काय गवत उपटत बसले होते का असा सवालही ठाकरे यांनी केला. पेशवे काळामध्ये लढाईसाठी, वसुलीसाठी गारदींची टोळी होती. वसुली करण्याची गारदींची टोळी तिकडे जमली आहे, अशा शब्दांतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली. (uddhav-thackeray-on-narendra-modi-and-devendra-fadanvis)

Devendra Fadanvis : आम्ही लोटलं नाही, ‘आ जा, आ जा’ म्हणून तुम्हाला खुर्ची बोलवत होती; फडणवीसांचे ठाकरेंवर वार

ठाकरे म्हणाले, दुसऱ्यांना छळण्याची विकृती त्यांच्याकडे आहे. पंतप्रधानांनी मणिपूरला जावे, असे मी म्हणाले. त्यानंतर मिंधे म्हणाले, सूर्यावर थंकू नका. मग काय तुमच्या सूर्याचा प्रकाश मणिपूरमध्ये पडत नाही का ? तिकडे सूर्य उगत नाही का?, मणिपूरमध्ये कायद्याचे राज्य संपुष्टात आले आहे. सीरिया, लिबियासारखी परिस्थिती होईल. त्यावेळी जनता पिसाळली होती होती लक्षात ठेवा.

देवेंद्र फडणवीस म्हणतात कोविडची लस मोदीजींनी तयार केली आहे. मग संशोधक काय गवत उपटत होते का ? असे अंधभक्त, विश्वगुरू आहेत. त्यांना व्हॅक्सिन देण्याची गरज आहे. असे व्हायरस कुठून येतात. एकापेक्षा एक अवली आहोत. लवली कुणीच नाही. तुम्ही अवली असली तरी जनता तावली आहे. तुमची झोप उडवतील, असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी साधला आहे.

Adipurush विरोधात कालिचरण महाराज मैदानात; चित्रपटावर बहिष्कार घालण्याचं केलं आवाहन

ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही जोरदार हल्ला केला आहे. दहा वर्षांपासून तुम्ही गादी उबवत बसला आहात. तुम्ही आल्यानंतर हिंदू मारले जात आहेत. तुम्ही विरोधकांना संपविण्याच्या मागे लागला आहात. त्यासाठी इडी, सीबीआयचा वापर केला जात आहे. देशाचे शत्रू आधी संपवा. चीन आपला प्रदेश बळकावत आहे. तिकडे शेपूट घालता आणि आमच्यावर फणा काढता का असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.

Tags

follow us