Download App

‘INDIA’ आघाडीला मोठा झटका! पंजाबमध्ये ‘AAP’ लढणार सर्वच जागा…

Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024)तोंडावर येऊन ठेपल्या असतानाच ‘INDIA’ आघाडीला (INDIA Alliacne)आणखी एक मोठा धक्का झटका बसला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी पंजाबमधील (Punjab)सर्वच्या सर्व 13 लोकसभा आणि चंदीगडच्या (Chandigarh)एका लोकसभा जागेवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. केजरीवाल हे लवकरच सर्व जागांसाठीचे उमेदवार जाहीर करणार आहेत.

गायकवाडांचा गोळीबार ते वागळेंवरील हल्ला : शिंदे सरकारचे विसर्जन करा, मविआचे नेते राज्यपालांकडे

आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील 13 लोकसभेच्या आणि चंदीगडमधील एका जागेसाठी उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगितले. यावेळी आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी जनतेकडून आशीर्वाद मागितले आहेत. पंजाब सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत रेशनच्या ‘डोअरस्टेप डिलिव्हरी’साठी आयोजित सभेला संबोधित करताना केजरीवाल यांनी ही घोषणा केली.

Prithviraj Chavan : राज्यातील गुन्हेगारीला सरकारकडून राजाश्रय; पृथ्वीराज चव्हाण कडाडले

केजरीवाल म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला होता. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम्हाला 117 जागांपैकी 92 जागा दिल्या. पंजाबमध्ये तुम्ही इतिहास घडवला. आज मी पुन्हा एकदा हात जोडून तुमचे आशीर्वाद मागतो आहे. लोकसभेच्या निवडणुका दोन महिन्यांनी होणार आहेत. पंजाबमध्ये 13 (लोकसभेच्या) जागा आहेत, चंदीगडमध्ये एक जागा आहे.

केजरीवाल यांनी सांगितले की, ‘आप’ येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये या सर्व 14 जागांवर आपले उमेदवार जाहीर करेल. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही दोन वर्षांपूर्वी जसा आशीर्वाद दिले तसेच पक्षाला या सर्व 14 जागा जिंकण्यासाठी मदत करा.

यावेळी केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह त्यांच्या सरकारचेही तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले की, मान यांनी गेल्या दोन वर्षांत खूप काम केले आहे.

अरविंद केजरीवाल हे पंजाबमध्ये लवकरच सर्व जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करणार आहेत. पंजाबपूर्वी बिहार आणि बंगालमध्येही ‘INDIA’आघाडीला धक्का बसला आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने सर्व जागा एकट्याने लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar)यांनी आरजेडीसोबतची युती तोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ‘INDIA’आघाडीसोबतचे एक-एक पक्ष बाजूला निघून जाताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता ‘INDIA’आघाडीसोबत किती राजकीय पक्ष राहणार हे पाहावं लागणार आहे.

follow us

वेब स्टोरीज