Download App

काय सांगता! तुमचे घर अन् ऑफीसातील ‘एसी’वरही सरकारचा कंट्रोल; नव्या नियमांत काय?

प्रस्तावित नियमानुसार, कोणत्याही एसीची सेटिंग 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ठेवताच येणार नाही. 

AC New Rules : देशभरात एसीच्या वापराबाबत केंद्र सरकारकडून लवकरच नव्या नियमांची (AC New Rules) घोषणा होणार आहे. केंद्रीय शहरी कार्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले की आता एसीचे (एअर कंडीशन) तापमान मानकीकृत केले जाणार आहे. देशभरात ऊर्जेचे संरक्षण आणि वीज वापर कीमी करण्यासाठी तसेच पर्यावरणाचे संतुलन विचारात हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित नियमानुसार, कोणत्याही एसीची सेटिंग 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ठेवताच येणार नाही.

केंद्र सरकारच्या 2047 साठीच्या व्हिजनची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत मंत्री खट्टर यांनी नवीन प्रस्तावित नियमांची माहिती दिली. खट्टर म्हणाले, मोदी सरकारने 11 वर्षे पूर्ण केली आहेत. सरकारने जी उद्दीष्टे ठरवली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आणखी 22 वर्षे बाकी आहेत. सन 2047 पर्यंत विकसित भारत तयार करण्याचं आमचं उद्दीष्ट आहे. यासाठी आगामी काळात आम्ही अधिक वेगाने काम करणार आहोत.

ऑपरेशन सिंदूरवर इतर देशांची प्रतिक्रिया काय?, पीएम मोदींनी घेतली सर्वपक्षीय शिष्टमंडळांची भेट

सरकार आता एक नवीन व्यवस्था लागू करणार आहे. या अंतर्गत देशभरातील सर्व एसीचे तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहणार नाही. एसीचे तापमान स्टँडर्डाइज करण्यासाठी नियमांची तरतूद केली आहे. या नव्या नियमांची लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाणार आहे.

या प्रस्तावित नियमानुसार एसी मग तो घरातील असो, ऑफीसमधील असो किंवा अन्य ठिकाणी असो या एसीचे तापमान 20 अंश ते 28 अंश सेल्सिअसपर्यंतच राहील. म्हणजेच वातावरण थंड करण्यासाठी 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि गरम करण्यासाठी 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त करता येणार नाही. अशा प्रकारचा प्रयोग देशात पहिल्यांदाच केला जात आहे.

जपानमध्ये 26 अंश सेल्सिअसपर्यंत एसी कंट्रोल करण्यात आला आहे. इटलीमध्ये 23 अंश सेल्सिअसपर्यंतच एसी कंट्रोल केलेला आहे. हे दोन्ही देश जगात विकसित म्हणून गणले जातात. त्या देशातील सरकारने ही व्यवस्था लागू केली आहे. आता आम्ही भारतात एसीचे तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत निश्चित करत आहोत असे मंत्री खट्टर यांनी स्पष्ट केले.

सरकारने हा निर्णय का घेतला याचा विचार केला तर यामागे काही कारणं आहेत. विजेची प्रचंड मागणी, वाढते वीज बिल आणि कार्बन उत्सर्जन एकाच वेळी कमी होणार आहे. ऊर्जा तज्ज्ञांच्या मते एसी तापमानात 1 अंश वाढ केल्याने सहा टक्के वीजेची बचत होते. याआधी इटलीने देशातील सर्व सार्वजनिक इमारतींत 23 अंश सेल्सिअसची मर्यादा निश्चित केली आहे.

GMC Doctor Suspension : मुख्यमंत्र्यांनी आपल्याच आरोग्यमंत्र्याला तोंडावर पाडलं…

follow us