Download App

‘Google Pay’, ‘Phone Pay’ वर वारंवार बॅलन्स चेक करताय? मग, आधी ‘हा’ नवा नियम लक्षात ठेवाच!

कोणताही ग्राहक UPI अँपच्या माध्यमातून दिवसातून फक्त 50 वेळा बँक खात्यातील बॅलन्स चेक करू शकेल.

Digital Payment Google Pay Balance Check : देशात डिजिटल पेमेंट वेगाने वाढत चालले आहे. रोख पैसे देण्याऐवजी लोक आता ऑनलाइन पेमेंटला (Digital Payment) प्राधान्य देत आहेत. मागील काही वर्षांपासून देशात डिजिटल पेमेंटची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. याच गोष्टीचा विचार करून UPI सिस्टम चालवणारी सरकारी संस्था NPCI ने काही महत्वाचे बदल केले आहेत. एक बदल आपल्या रोजच्या सवयीशी संबंधित आहे. या नियमाची माहिती असणे गरजेचे आहे.

खरंतर आपल्यातील बरेच जण असे आहेत ज्यांना वारंवार बॅलन्स चेक (Balance Check) करण्याची सवय असते. दिवसातून बऱ्याच वेळा खात्यात किती पैसे शिल्लक आहेत याचा अंदाज घेतात. Google Pay, Phone Pay, Paytm द्वारे बॅलन्स चेक करतात. काही तर असे असतात की प्रत्येक व्यवहारानंतर बॅलन्स चेक करतात. ही सवय वाईट नाही पण गरज नसताना शिल्लक तपासणे बरोबर नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे.

आता ही गोष्ट सरकारच्याही लक्षात आली आहे. त्यामुळे या सवयीला लगाम लावण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कोणताही ग्राहक UPI अँपच्या माध्यमातून दिवसातून फक्त 50 वेळा बँक खात्यातील बॅलन्स चेक करू शकेल. आतापर्यंत यावर कोणतेच बंधन नव्हते. पण सिस्टिमचा वेग आणि वाढता लोड विचारात घेता बॅलन्स चेक करण्यावर बंधन घालण्यात आले आहे. जर एखादा ग्राहक ठरवून दिलेल्या लिमिटपेक्षा जास्त वेळ बॅलन्स चेक करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अडचणी येऊ शकतात किंवा तो बॅलन्स चेक करू शकणार नाही.

डिजीटल पेमेंटचं पुढचं व्हर्जन आलं; नखाला ATM चिप लावून पोरीनं सक्सेसफुल्ल केलं पेमेंट, पहा व्हिडिओ

आता फक्त 10 सेकंदात पेमेंट

आता UPI द्वारे पेमेंट करणे पहिल्यापेक्षा अधिक वेगवान होणार आहे. याआधी पेमेंट प्रोसेसाठी 30 सेकंद लागत होते आता मात्र दहा सेकेंदातच पेमेंट होणार आहे. जर तुम्ही एखाद्याला पैसे पाठवत असाल किंवा एखादे पेमेंट करत असाल तर हा व्यवहार फक्त 10 सेकंदात पूर्ण होईल. हा बदल 16 जूनपासून लागू झाला आहे. UPI पेमेंट पेमेंटमध्ये गतिशीलता आणण्यासाठी अधिक सोपे आणि चांगले करण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत. यामुळे ऑनलाईन पेमेंटमधील अडचणी आणखी कमी होतील.

यूपीआय ही सर्विस आल्यापासून ज्याप्रमाणे आर्थिक व्यवहार एका क्लिकवर करणे शक्य झाले आहे. त्यामुळे आता एटीएममधून कॅश काढून व्यवहार करण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे लोक आला एटीएम कार्ड बाळगत देखील नाहीत.

follow us