Download App

Delhi Murder Case : ‘लव्ह जिहाद’ असो नाहीतर ‘एकतर्फी प्रेम’ आरोपीला कठोर शिक्षाच, पोलिस आयुक्तांची ग्वाही

Delhi Murder Case : 16 वर्षीय मुलीच्या हत्याकांडाचं प्रकरण लव्ह जिहाद असो किंवा एकतर्फी प्रेम सर्वच बाजूने तपास करुन आरोपीला कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पोलिस आयुक्त दिपेंद्र पाठक यांनी दिली आहे.

Disha Patni Photo; नॅशनल क्रश दिशा पटनीचे हॉट अन् बोल्ड फोटोशूट

दरम्यान, राजधानी दिल्लीत प्रियकराने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 40 वेळा चाकूने वार केल्यानंतर दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार घडलाय. या घटनेचे एकच खळबळ उडालीय.

Siddharth Jadhav: अभिनेता सिद्धार्थ जाधवला चाहत्याने दिली आईवरुन शिवी, संतप्त होत म्हणाला …

पुढे बोलताना दिपेंद्र पाठक म्हणाले, या घटनेनंतर आम्ही तत्काळ सीसीटिव्ही फूटेज तपासून आरोपीला उत्तर प्रदेशातल्या बुलंद शहरातून अटक केली आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे न्यायालयात सादर करुन आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्हांला मिळालेल्या माहितीनूसार घटनेतील आरोपी साहिल हा एसी आणि रेफ्रिजरेटर मेकॅनिक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

गौतमी पाटील आणि सुषमा अंधारे दोन्ही अॅक्टर; शिंदे गटाच्या आमदाराने डिवचलं

16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं साहिलशी प्रेमसंबंध सुरु होते. मात्र, साहिलच्या दोन बहिणींचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विषय सोडून दे, असा सल्ला नेहमीच दोन्ही बहिणी साहिलला देत होत्या. मात्र, बहिणीच्या सल्ला झुगारुन साहिल आणि अल्पवयीन मुलगी दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. तब्बल दोन वर्षांपासून ते दोघे लिव्ह-इनमध्ये होते.

हे प्रेम प्रकरण सुरु असतानाच साहिलच्या दोन्ही बहिणींनी साहिला तु जितक्या लवकर मुलीपासून दूर होशील तितके स्वत:सह कुटुंबियांसाठी चांगलं होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, साहिलने कुटुंबियांचं न ऐकता मुलीशी प्रेमसंबंध सुरुच ठेवलं होतं.

जमालगोट्यावरून अजितदादांचे शिंदेंना खडेबोल! म्हणाले, सुंसस्कृत महाराष्ट्रात…

त्यानतंर अखेर दोघांमध्ये झालेल्या वादाचा शेवट झाला. प्रेयसी एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जात असतानाच भर रस्त्यात साहिलने तिच्यावर चाकूने तब्बल 40 वार केल्यानंतर त्याने तिला दगडाने ठेचून संपवले आहे. ही चित्त थरारक घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली.

दरम्यान, आरोपी साहिलला अटक केल्यानंतर त्याच्या हातात दोरा अन् गळ्यात रुद्राक्ष घातल्याची माहिती समोर आली आहे. नूकताच द केरला स्टोरी चित्रपट रिलीज झाल्याने ही लव्ह जिहादची घटना तर नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच एका समुदायाकडून हिंदु मुलींना टार्गेट केल जात असून यामागचा खरा सुत्रधार कोण आहे? असा सवाल भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केला आहे.

Tags

follow us