Download App

दादरी ते अहमदाबाद… देशातील दहा मोठे विमान अपघात

देशातील आणि जगातील विमान अपघाताचा इतिहास पाहिला तर हा सर्वात मोठा विमान अपघात आहे. देशातील सर्वात मोठे विमान अपघात कुठे आणि कसे झाले ?

  • Written By: Last Updated:

Top 10 biggest plane crashes in the country: विमान प्रवास सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो. अपघात होऊ नये म्हणून सुरक्षाचे मापदंड पाळले जातात. परंतु एखादा अपघात झाल्यास शेकडो प्रवासांना जीवन गमवावा लागतो. गुरुवारीच अहमदाबादहून (Ahmedabad लंडनला जाणारे एअर इंडियाचे (Air India) बोईंग 787-8 ड्रीमलाइनर हे विमान कोसळले. उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात हे विमान एका इमारतीवर कोसळले. त्यात बारा क्रू मेंबर व 230 प्रवासांचा मृत्यू झालाय. देशातील आणि जगातील विमान अपघाताचा इतिहास पाहिला तर हा सर्वात मोठा विमान अपघात आहे. देशातील सर्वात मोठे विमान अपघात कुठे आणि कसे झाले ? देशातील दहा मोठे विमान अपघातांबाबत जाणून घेऊया…


अहमदाबाद विमान अपघाताचे कारण शोधणारा Black Box असतो तरी काय? जाणून घ्या सर्वकाही

1996 : चरखी-दादरी विमान अपघात, 349 मृत्यू
देशातील सर्वात मोठा विमान अपघात 12 नोव्हेंबर 1996 रोजी हरियाणातील चरखी दादरी येथे घडला होता. सौदी अरेबियन एअरलाईन्सचे 763 आणि कझाकस्तान एअरलाईन्सचं 1907 ही दोन विमाने एकाशात एकमेकांशी धडकले. या अपघातात दोन्ही विमानांमध्ये प्रवास करणाऱ्या एकूण 349 जणांचा जीव गेला होता. (Top 10 biggest plane crashes in the country)

1978 मुंबईत 213 जणांचा मृत्यू
1978 च्या जानेवारीला नवववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत एक भीषण विमान अपघात झाला होता. या अपघातात एअर इंडियाचं बोईंग 747-237B हे विमान कोसळले. या विमानात प्रवास करणारे सर्व प्रवासी आणि कर्मचारी असा 213 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात 190 प्रवासी आणि 23 कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघात, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन

2010 मध्ये मंगलोर अपघात 158 जणांचा मृत्यू
22 मे 2010 रोजी एअर इंडियाचं IX-812 हे विमान मंगलोरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले होते. बोईंग कंपनीचं 737-800 हे विमान दुबईहून मंगलोरला येत होते. दुबईला नोकरीला गेलेले भारतीय मायदेशी परतत होते. मंगलोर येथे टेबलटॉप रनवे होता. धावपट्टीवर विमान उतरल्यानंतर ते व्यवस्थित लँड होऊ शकले नाही. ते विमान खोल खड्ड्यात कोसळून विमानाचा स्फोट होऊन आग लागली. या अपघातात 158 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात आठ जण बचावले होते.

अहमदाबादमध्ये विमान कोसळून 133 जणांचा मृत्यू
19 ऑक्टोबर 1988 रोजी 37 वर्षांपूर्वी अहमदाबादमध्ये भयंकर विमान अपघात झाला होता. विमानतळाजवळच इंडियन एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. त्यात 133 जणांचा मृत्यू झाला होता. बोइंग 737-200 हे विमान सकाळी सहा वाजता मुंबईवरून अहमदाबादला जात होते. कमी दृश्यमानतेमुळे पायलटने अहमदाबाद विमानतळावरून हवामानाची माहिती मागितली. पण विमान उतरविण्याची परवानगी मागितली नाही. पण सकाळी 6.53 वाजता विमान चिलोडा कोतारपूरजवळ एका झाडावर आणि वीज ट्रान्समिशन टॉवरवर आदळले. तेव्हा विमान एक हजार फूट उंचीवर होते. त्यात सर्वाच 133 जणांचा मृत्यू झाला.

7 जुलै 1962 मध्ये 94 जणांचा मृत्यू
7 जुलै 1962 मध्ये एलिटालिया फ्लाइट 777 क्रॅश झाले होते. हे विमान ऑस्ट्रेलियातील सिडनीहून रोमकडे जाते होते. हे विमान भरकटले. मुंबईपासून सुमारे 84 किलोमीटर दूर जुन्नर येथे डोंगरला धडकले. त्यात 94 जणांचे मृत्यू झाला होता. या विमानात विदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात होते.

14 जून 1972 मध्ये 82 जणांचा मृत्यू
14 जून 1972 मध्ये हरियाणातील पालम विमानतळ येथे जपान एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. त्यात 87 पैकी 85 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात जमिनीवर असलेल्या तीन जणांनाही आपले प्राण गमवावे लागले. जपान आणि भारताने या घटनेची वेगवेगळी कारणे दिली. परंतु खरे कारण समोर आलेच नाही.

12 ऑक्टोबर 1976 मध्ये 95 जणांचा मत्यू
12 ऑक्टोबर 1976 मध्ये मुंबईमध्ये विमान अपघातात 95 जणांचा मृत्यू झाला होता. इंडियन एअरलाइन्स प्लॉइट 171 हे मुंबईवरून चेन्नईला जात होते.
बोईंग विमानाने टेकऑफ गेतल्यानंतर इंजिनमध्ये लगेचच बिघाड झाला. त्यावेळी पायलटने आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. पण विमानाला आग लागली आणि पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटले. या घटनेत कोणीही वाचले नाही, सर्व जणांचे मृत्यू झाले.

बंगळुरू विमानतळ अपघातात 92 जणांचा मृत्यू
14 फेब्रुवारी 1990 रोजी बंगळुरूत विमान अपघात झाला होता. मुंबईहून बंगळुरूला जाणारे इंडियन एअरलाइन्सचे एअरबस विमान विमानतळावर उतरताना जवळच्या गोल्फ कोर्समध्ये कोसळले. विमानातील 146 जणांपैकी 92 जणांचा मृत्यू झाला. पायलटच्या चुकीच्या लँडिंगमध्ये हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

संभाजीनगरमधील विमान अपघातात 55 जणांचा मृत्यू
26 एप्रिल 1993 रोजी पूर्वीच्या औरंगाबाद व आताच्या संभाजीनगरमध्ये विमान अपघात झाला होता. इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट 491 औरंगाबादहून मुंबईला निघाले. ते बोईंग 737 ए आठ विमान होते. हे विमान उड्डाण घेताच विमानतळाजवळ कोसळले. हे विमान धावपट्टीच्या शेवटी उभ्या असलेल्या लॉरीशी आदळले. तपासास असे उघडकीस आले की पायलटने टेकऑफबद्दल चुकीचा अंदाज लावल्याने हा अपघात झाला आहे.

12 जून 2025-242 जणांचा मृत्यू
12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथील विमान अपघात हा देशातील सर्वात मोठा दोन नंबरचा अपघात आहे. विशेष म्हणजे पहिला अपघात दोन विदेशी एअरलाइन्समध्ये हरियाणा येथे झाला होता. त्यात 349 जणांचा आकाशामध्ये मृत्यू झाला होता. अहमदाबादमधील अपघातात विमानामधील 230 प्रवासी आणि 12 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. एअर इंडियाचा हा आतापर्यंतच सर्वात मोठा अपघात आहे. या अपघातानंतर प्रवासांची सुरक्षेसाठी, विमान उड्डाणांबाबच दक्षता घेण्यासाठी सरकारला पावले उचलावे लागणार आहेत.

follow us