Parliament Monsoon Session : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते मात्र यानंतर देशात सत्ताधारी आणि विरोधकांकडून ऑपरेशन सिंदूरवर जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी होत आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, केंद्र सरकारकडून संसदेच्या मान्सून अधिवेशनासाठी (Parliament Monsoon Session) तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जुलै ते 12 ऑगस्ट 2025 पर्यंत संसदेचा पावसाळी अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याची माहिती किरेन रिजिजू यांच्याकडून देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे विरोधक सुरक्षा धोरण, ऑपरेशन सिंदूर, पहलगाम दहशतवादी हल्ला, महागाई आणि बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर केंद्र सरकारवर हल्लाबोल करु शकतो.
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, विरोधकांची मागणी
ऑपरेश सिंदूरनंतर एका मुलाखतीमध्ये भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान (Anil Chauhan) यांनी पाकिस्तानशी झालेल्या तणावादरम्यान भारताचे देखील नुकसान झाले असं म्हणाले होते. यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेश बोलवण्याची मागणी केली होती.
Government has decided to commence Monsoon Session of Parliament from 21st July to 12th August 2025: Parliamentary Affairs Minister Kiren Rijiju pic.twitter.com/E81seVxDH5
— ANI (@ANI) June 4, 2025
तर दुसरीकडे ‘इंडिया’ या आघाडीत समाविष्ट 16 पक्षांनी मंगळवारी केंद्र सरकारवर दबाव वाढवण्याच्या उद्देशाने संयुक्त बैठक घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. विरोधी पक्षाचे म्हणणे आहे की, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी सिंगापूरमध्ये दिलेल्या विधानानंतर संसदेत ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर चर्चा आवश्यक झाली आहे. विरोधी पक्षांनी संयुक्तपणे पंतप्रधानांना पत्र पाठवून विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
शनिशिंगणापूर देवस्थानच्या नावाने बनावट ॲप…कोट्यावधींची फसवणूक
या पक्षांनी बैठकीत भाग घेतला
मंगळवार झालेल्या या बैठकीत काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, राजद, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), नॅशनल कॉन्फरन्स, सीपीएम, सीपीआय, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, जेएमएम, व्हीसीके, केरळ काँग्रेस, एमडीएमके आणि सीपीआय (एमएल) यासारख्या प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाग घेतला.