Download App

भाविकांवर काळाचा घाला! भीषण अपघातात पाच ठार, 11 जखमी

Road Accident : तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन माघारी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाची मालवाहू ट्रकला जोरदार धडक (Road Accident) बसली. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले. या पाच जणात चालकाचाही समावेश आहे. पाचजण बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बडची या गावचे रहिवासी आहेत. शुक्रवारी सकाळी आंध्र प्रदेशातील अन्नमया जिल्ह्यातील तिरुपतीजवळील कव्वीपल्ली येथे ही दु्र्दैवी घटना घडली. या अपघातात अकरा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या दवाखान्यात उपचार सुरू असून यातील सात जणांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे, असे सांगण्यात आले.

सावधान! निपाह व्हायरस कोरोना संसर्गापेक्षाही घातक, ICMR चा धोक्याचा इशारा

याबाबत आधिक माहिती अशी, बेळगाव जिल्ह्यातील (कर्नाटक) अथणी येथील भाविक आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन पुन्हा आपल्या गावी परतत होते. यानंतर अन्नमया जिल्ह्यात आल्यानंतर भरधाव वेगातील वाहनाने मालट्रकला जोराची धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातात जे जखमी झाले होते त्यांना तिरुपतीतील रुवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाविकांचे वाहन कडप्पा येथून चित्तूरकडे निघाले होते. या वाहनांत एकूण 16 प्रवासी होती. दर्शन घेऊन ते या मार्गे बेळगावकडे येत होते. मात्र त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला याची पूर्ण माहिती अजून समोर आलेली नाही अस नागाबाबू मंडळ पोलीस निरीक्षक मेथाम्पल्ली यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ‘रामचरितमानसमधील काही गोष्टी पोटॅशियम सायनाइडसारख्या’

Tags

follow us