Download App

भारतीय लष्करात सैन्य भरती रोखून लष्कराचा आकार कमी केला.. माजी मेजर जनरल बक्षी संतापले

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांची

  • Written By: Last Updated:

Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Attack) हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजता झालेल्या या हल्ल्यात 20 हून अधिक लोक जखमी झाले. लष्कर-ए-तैयबाची शाखा द रेझिस्टंट फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गोळीबारानंतर दहशतवादी पळून गेले. पहलगाम हल्ल्यात दोन परदेशी दहशतवादी आणि दोन स्थानिक दहशतवादी सहभागी असल्याचं समोर आलं आहे.

या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की.. पहलगाम हल्लानंतर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, बैसरन व्हॅलीमध्ये दोन हजारांवर पर्यटक जमले होते. या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एकही पोलिस किंवा सुरक्षा यंत्रणांचा कर्मचारी उपस्थित नव्हता, अशी माहिती समोर येत आहे. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर माजी मेजर जनरल जीडी बक्षी यांनी सैन्य कपातीवर घणाघाती हल्ला चढवला आहे. भारतीय लष्करात सैन्य भरती रोखून लष्कराचा आकार 1 लाख 80 हजारांनी कमी केला. कोणाची ही बुद्धिमानी आयडिया होती? अशी विचारणा त्यांनी इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला. तुम्ही म्हणता पैसा वाचवू कारण अशी पद्धतीने लोक मारले जावेत? पर्वतीय प्रदेशात, जंगलामध्ये लढण्यास सेना हवीच, असंही ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांची ओळख पटली आहे. संतोष जगदाळे यांच्या डोक्यात, कानात आणि पाठीत गोळ्या लागल्या. तर कौस्तुभ गणबोटे यांच्या पाठीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. जगदाळे त्यांच्या कुटुंबासह पहलगामला भेट देण्यासाठी आले होते. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगीही होती. तिथे एक महिला नातेवाईकही होती. दहशतवाद्यांनी तिन्ही महिलांना सोडलं. जगदाळे यांच्या मुलीने सांगितले की, दहशतवाद्यांनी त्यांच्या वडिलांना कलमा म्हणण्यास सांगितले होतं आणि जेव्हा ते तसे करू शकले नाहीत तेव्हा त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

माझ्यासमोर वडिलांना गोळ्या घातल्या

मुलगी आसावरी जगदाळे यांनी फोनवरून पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही पाच जणांचा गट होतो. ज्यामध्ये माझे पालकही होते. आम्ही पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये होतो तेव्हा आम्हाला गोळीबाराचा आवाज ऐकू आला. पोलिसांच्या गणवेशात असलेले काही लोक गोळ्या झाडत असल्याचे पाहिले. आसावरी म्हणाली, आम्ही सर्वजण जवळच्या तंबूत लपलो. इतर 6-7 जणही आले. गोळीबार टाळण्यासाठी आम्ही सर्वजण जमिनीवर पडलो, सुरुवातीला आम्हाला वाटलं की ही अतिरेकी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमधील चकमक आहे.

follow us