Download App

कर्नाटकात सरकार आल्यानंतर महिलांचा प्रवास फुकटात

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi On BJP In Karnatka : कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने पाचवे आश्वासन दिले आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांना सार्वजनिक वाहतूक बसमध्ये मोफत प्रवास करण्याचे आश्वासन पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिले. पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी राहुल उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात पोहोचले.

काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण करणार नाही, असे वक्तव्य करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेस नेत्याने निशाणा साधला. राहुल म्हणाले- नरेंद्र मोदी म्हणतात की काँग्रेस पक्ष आपली आश्वासने पूर्ण करणार नाही. आम्ही तुम्हाला (लोकांना) चार आश्वासने दिले आहेत आणि पहिल्याच दिवशी, पहिल्या कॅबिनेट बैठकीत त्यांची अंमलबजावणी होईल. मोदीजी, तुम्ही म्हणाला हे पूर्ण होणार नाहीत, परंतु मी अजून आश्वासने देत आहे. राहुल म्हणाले, आम्ही पहिल्या दिवशी केवळ चार हमीपत्रे पूर्ण करणार नाही, तर पाचवी हमीही पूर्ण करू.

जाहीर सभेला संबोधित करताना राहुल म्हणाले- सध्याच्या चार आश्वासनमध्ये आम्ही आणखी एक आश्वासन देत आहोत. हे महिलांसाठी असेल. मोदीजी लक्ष देऊन ऐका. काँग्रेसची सत्ता येताच पहिल्याच दिवशी पाचव्या आश्वासनाची अंमलबजावणी होणार आहे. संपूर्ण कर्नाटकात महिला सार्वजनिक परिवहन बसमधून मोफत प्रवास करतील.

‘भाजपने 40 टक्के कमिशनचा पैसा लुटला’

ते म्हणाले- तुमच्या (भाजप) लोकांनी कर्नाटकातील महिलांचे ४० टक्के कमिशन घेऊन पैसे लुटले, हे तुमचे काम आहे. कर्नाटकातील महिलांना राज्याचे पैसे देणे हे आमचे काम आहे, त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच बसमध्ये कोणत्याही महिलेला भेटले की बस प्रवासासाठी एक रुपयाही दिला जात नाही.

राधाकृष्ण विखे पाटलांशी दोस्ती पण… अब्दुल सत्तारांनी घेतला यूटर्न

‘भाजपला 40 जागांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आवाहन’

भाजपला राज्यातील 40 जागांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आवाहन राहुल यांनी मतदारांना केले. ते म्हणाले- हा असा पक्ष आहे, जो 40 टक्के कमिशन घेऊन सरकार चालवत होता. भाजपने चोरीची सवय बनवली असून, तरुण, शेतकरी, मच्छीमार अशा सर्वच घटकांचा विश्वासघात करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप युवकांना आश्वासनाप्रमाणे रोजगार देऊ शकले नाही. ते म्हणाले की, भाजपच्या राजवटीत महागाई वाढली आणि या राजवटीत अनेक लघुउद्योग बंद पडले.

भाजपने अदानींना दिलेली आश्वासने पूर्ण केली’

काँग्रेस गॅरंटी कार्डची सर्व आश्वासने पुढील सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत ठरवली जातील, असे राहुल म्हणाले. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने वर्षभरात दोन कोटी युवकांना नोकऱ्या देणे आणि भ्रष्टाचार संपवून प्रत्येक घराला 15 लाख रुपये देण्यासह एकही आश्वासन पूर्ण केले नाही. भाजपने गरीब, तरुण आणि शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत आणि त्यांच्यासाठी काहीही केले नाही, तर त्यांनी (भाजप) अदानींना दिलेली आश्वासने पाळली आहेत. ते म्हणाले की, भाजप सरकार आणि अदानी यांच्यातील संबंधांवर प्रश्न विचारल्यामुळे मला संसदेतून अपात्र ठरवण्यात आले. ते म्हणाले- माझ्या प्रश्नाचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी अद्याप दिलेले नाही.

Tags

follow us