Download App

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला, २७ जणांचा मृत्यू; अमित शाह श्रीनगरला रवाना

Terrorist Attack जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत.

  • Written By: Last Updated:

Terrorist Attack On Tourists In Pahalgam : जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. पहलगाममधील बैसरन खोऱ्याच्या वरच्या भागात हा हल्ला झाला आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ माजली असून, सुरक्षा दलाकडून दहशवाद्यांचा शोध घेतला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असतानाच हा हल्ला झाला आहे. त्यानंतर आता शाह हे श्रीनगरला रवाना झाले आहेत. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील एका पर्यटन स्पॉटवर मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. यात अनेक पर्यटक जखमी झाले असून, २७ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Amit Shah : POK भारताचा, तिथले लोकही आपलेच; अमित शाहांनी पाकिस्तानला ठणकावलं

हे पर्यटक राजस्थानहून आल्याचे समोर आले आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यातील वरच्या भागात हा गोळीबार झाला असून, या घटनेनंतर सुरक्षा दलांकडून परिसरात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करण्याची ही पहिलीच घटना आहे. दहशतवादी हल्ल्यात नेमके किती पर्यटक जखमी झाले किंवा किती लोकांना गोळ्या लागल्या याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Turkey Attack: मोठी बातमी! तुर्कीच्या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी TUSAS वर दहशतवादी हल्ला

अलिकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी हिंदूंविरुद्ध एक भडकाऊ विधान केले होते. यानंतर लगेचच दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले आहे. त्यात अवघ्या काही दिवसात अमरनाथ यात्रादेखील सुरू होणार असून, पहलगाम हे पर्यटन क्षेत्र असल्याने आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. मात्र, आजच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, या हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे.

मोदींचा परदेश दौऱ्यातून शाहंना फोन

जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. पंतप्रधान सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी अमित शहांशी हल्ल्याबाबत चर्चा केली. पंतप्रधानांनी शहा यांना आवश्यक ते सर्व पाऊल उचलून शाहं यांना योग्य उपाययोजना करण्यास सांगितले आहे. तसेच पंतप्रधानांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना घटनास्थळाला भेट देण्यास सांगितले आहे.त्यानंतर आता अमित शाह श्रीनगरला रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदींशी बोलल्यानंतर, शहा यांनी त्यांच्या निवासस्थानी अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

 

follow us