Download App

Video : पहलगामच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्याची आत्महत्या; व्हिडिओ होतोय व्हायरल

ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर अहरबल परिसरातील एका नाल्यातून तरुणाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाची

Pahalgam Terror Attack : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील टांगीमर्ग येथे चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका तरुणाने पळून जाण्याच्या प्रयत्नात नाल्यात उडी मारली. यामध्ये त्याचा बुडून मृत्यू झाला. तरुण पाण्यात उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, हा तरुण दहशतवाद्यांचा साथीदार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (Attack ) दरम्यान, पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी याला संशयास्पद म्हटलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. २३ वर्षीय इम्तियाज अहमद मगरे हा अहरबल परिसरातील रहिवासी होता.

इम्तियाजला शनिवारी टांगीमार्ग परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशीदरम्यान त्याने कबूल केलं की त्याने दहशतवाद्यांसाठी जेवण आणि इतर गोष्टींची व्यवस्था केली होती. सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, चौकशीच्या आधारे त्याला दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणी नेले जात होते. पोलीस आणि सैन्याचे संयुक्त पथक त्याला रविवारी सकाळी दहशतवाद्यांच्या संभाव्य ठावठिकाणाकडं घेऊन जात होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि विश्वा नदीत उडी मारली पण पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला.

पहलगाम हल्ल्यामागे कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड? धक्कादायक अपडेट

ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर अहरबल परिसरातील एका नाल्यातून तरुणाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे. संतप्त नातेवाईकही मृतदेह पोलिसांना देण्यास नकार देत होते. खूप समजावणी केल्यानंतर त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पोलिसांच्या ताब्यात दिला. दरम्यान, पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी एक्सवर लिहिले की, कुलगाममधील एका नाल्यातून आणखी एक मृतदेह सापडला आहे, ज्यामुळे गैरप्रकाराचे गंभीर आरोप झाले आहेत.

स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की इम्तियाज मागरे यांना सुरक्षा दलांनी उचलून नेले होते आणि आता त्यांचा मृतदेह गूढपणे नाल्यात सापडला आहे.त्या म्हणाल्या की, पहलगाममधील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधील शांतता बिघडवण्याचा, पर्यटनात व्यत्यय आणण्याचा आणि देशभरातील सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याचा सुनियोजित प्रयत्न असल्याचे दिसून येते. ते म्हणाले की, याची संपूर्ण आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

follow us