Lok Sabha Elections ; ‘आघाडीचा बसपाला नेहमीच तोटाच’, मायावतींनी दिला स्वबळाचा नारा

Mayawati : आगामी लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. बुधवारी बसपा (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी लखनऊ (Lucknow) येथील मुख्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून अजेंडा स्पष्ट केला. मायावतींनी आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections 2024) स्वबळावर लढवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मायावती म्हणाल्या की, भाजप सतत आपला जनमानस गमावत आहे. ही निवडणूक एकतर्फी नाही. […]

Mayawati

Mayawati

Mayawati : आगामी लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. बुधवारी बसपा (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी लखनऊ (Lucknow) येथील मुख्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून अजेंडा स्पष्ट केला. मायावतींनी आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections 2024) स्वबळावर लढवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

मायावती म्हणाल्या की, भाजप सतत आपला जनमानस गमावत आहे. ही निवडणूक एकतर्फी नाही. निवडणूक अत्यंत रंजक असणार आहे. यावेळी बसपा प्रमुख मायावती यांनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली.

कार्यकर्त्यांना कानमंत्र
मायावती यांनी आजच्या बैठकीत सार्वत्रिक निवडणुकांबाबत रणनीती आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. प्रत्येक गावात कॅडर आणि छोट्या सभांच्या आधारे बसपाला बळकट करा आणि समाजातील जनाधार वाढवा, असे त्यांनी सांगितले. उमेदवार निवडीत विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

आघाडी केल्याचा नेहमी तोटाच
मायावती म्हणाल्या की, आघाडी केल्याने बसपचे नेहमीच नुकसान होते. आमचे मत दुसर्‍या पक्षाकडे जाते. इतर पक्ष त्यांची मते बसपा उमेदवारांना करत नाहीत. या कटू वास्तवाकडे दुर्लक्ष करून आपण पुढे जाऊ शकत नाही.

पक्षाला तळागाळात पुन्हा मजबूत करण्यासाठी संघटनेच्या छोट्या बैठका घेण्याचे आदेश मायावतींनी दिले आहेत. मायावती पदाधिकाऱ्यांना म्हणाल्या- तन, मन, धनाने संघटना मजबूत करण्याच्या दिशेने जमिनीवर काम करा.

भाजपाने जनाधार गमावला
त्या म्हणाल्या, बसपा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही आघाडीपासून अलिप्त आणि दूर राहील. भाजपच्या संकुचित, जातीयवादी राजकारण आणि द्वेष आणि अराजकतेमुळे प्रत्येकजण अस्वस्थ आणि दुःखी आहे. त्यामुळेच भाजप आपला प्रभाव आणि जनमानस दोन्ही सतत गमावत आहे. त्यामुळे यूपीमध्ये लोकसभा निवडणूक एकतर्फी होणार नसून ती अत्यंत रंजक ठरणार असून देशाच्या राजकारणाला नवे वळण देणारी ठरणार आहे.

Exit mobile version