राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमध्ये ब्रेक, सरकारने दिले ‘हे’ कारण

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) सुरुवात होण्यापूर्वीच अडथळा आला आहे. मणिपूर सरकारने (Manipur Govt) इम्फाळ पूर्वेतील हप्ता कांगजेबुंग येथून सुरू होणाऱ्या यात्रेची परवानगी नाकारली आहे. या यात्रेमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री […]

Bharat Jodo Nyay Yatra

Bharat Jodo Nyay Yatra

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) सुरुवात होण्यापूर्वीच अडथळा आला आहे. मणिपूर सरकारने (Manipur Govt) इम्फाळ पूर्वेतील हप्ता कांगजेबुंग येथून सुरू होणाऱ्या यात्रेची परवानगी नाकारली आहे. या यात्रेमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कीशम मेघचंद्र म्हणाले की मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रेला परवानगी नाकारताना मणिपूरमधील प्रतिकूल परिस्थितीचे कारण सांगितले आहे.

काँग्रेसकडून 2 जानेवारीला परवानगीसाठी अर्ज
कीशम मेघचंद्र म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) च्या नेतृत्वाखाली काँग्रेस एका खाजगी ठिकाणाहून यात्रेला सुरुवात करणार आहे. 66 दिवसांच्या यात्रेसाठी पक्षाने अधिकृतपणे 2 जानेवारीला अर्ज सादर केला होता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 14 जानेवारीला या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत, असे ते म्हणाले.

T20 मालिकेपूर्वीच अफगाणिस्तानला मोठा धक्का, घातक गोलंदाज संघातून बाहेर

भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून सुरू होणार असून 15 राज्यांतून प्रवास करत 20 मार्च रोजी मुंबईत समारोप होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा यशस्वीपणे पार पडल्यानंतर दुसरी यात्रा सुरु होत आहे.

Vibrant Gujarat Summit : ‘जे बोलतो ते पूर्ण होतं’; PM नरेंद्र मोदींनी दिली जनतेला गरंटी

दुसरीकडे, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणालेे की, मणीपूर सरकारने इम्फाळमधील पॅलेस मैदानावरुन यात्रा आयोजित करण्याची आमची विनंती नाकारल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही पूर्वेकडून पश्चिमपर्यत यात्रा सुरू करत आहोत तर आम्ही मणिपूरपासून कसे दूर राहू शकतो? मग आम्ही देशातील जनतेला काय संदेश देणार आहोत? प्रवासाची सुरुवात मणिपूरपासूनच करायची आहे. आता आपण मणिपूरमधील दुसऱ्या ठिकाणाहून यात्रा सुरू करणार आहोत. तपशील नंतर जाहीर केला जाईल.

Exit mobile version