NIA Exposed PFI Plan To Bring Islamic Rule In India : पीएफआयच्या कटाबद्दल एक मोठा खुलासा झालाय. देशात 2047 पर्यंत देशात इस्लामिक राजवट आणण्यासाठी मोठे कट रचले जात आहे, असा दावा एनआयएने ( PFI Conspiracy) केलाय. आरएसएस कार्यकर्ते श्रीनिवासन यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने न्यायालयात हा खुलासा केला. 11 जून रोजी एनआयएच्या एर्नाकुलम न्यायालयाने मोहम्मद बिलाल, रियाउशदिन आणि इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. हे सर्वजण ज्या प्रकरणात आरएसएस कार्यकर्ते श्रीनिवासन यांची निर्घृण हत्या करण्यात (Islamic Rule In India) आली होती, त्या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने न्यायालयात (NIA) खूपच धक्कादायक गोष्टी मांडल्या आहेत.
पीएफआयचा मोठा कट
एनआयएने न्यायालयाला सांगितले की, बंदी घातलेल्या पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या संघटनेचे सदस्य आणि अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून एका मोठ्या कटात सहभागी होते. त्यांचा उद्देश 2047 पर्यंत देशात दहशत पसरवणे, सांप्रदायिक तणाव वाढवणे आणि भारतात इस्लामिक राजवट लादणे हा आहे. एनआयएच्या मते, पीएफआयचे सदस्य यापूर्वी सिमीसारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. त्यांचे लष्कर-ए-तोयबा, आयसिस आणि अल-कायदासारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशीही संबंध आहेत. संघटनेचे अनेक कार्यकर्ते या दहशतवादी संघटनांचे सदस्य राहिले आहेत.
मातोश्री-शिवतीर्थावर काय आणि कसं घडलं? राऊतांनी सांगितली पडद्यामागची मनोमिलनाची स्टोरी
केरळसह देशाच्या अनेक भागात पीएफआयच्या लोकांनी हिंसाचार आणि खून केले. ज्यामुळे सामान्य लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. एनआयएचा दावा आहे की, पीएफआय केवळ दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत नव्हता, तर देशाचे संविधान आणि लोकशाही संपवून नवीन इस्लामिक संविधान लागू करण्याची योजना देखील आखत होता. त्याच्या योजनेचे चार टप्पे होते.
पीएफआयच्या योजनेचे चार टप्पे
पहिल्या टप्प्यात, मुस्लिम समुदायाला एकाच झेंड्याखाली आणायचे होते. मग एसडीपीआय नावाच्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना एकत्र करून निवडणुका जिंकायच्या होत्या. त्यानंतर, त्यांना समाजात फूट निर्माण करून हळूहळू सत्तेत घुसायचे होते. अंतिम टप्प्यात, एसडीपीआयला संपूर्ण मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधी बनवण्याची आणि इतर मुस्लिम संघटनांना बाजूला ठेवण्याची योजना होती.
सिनेमा क्षेत्रात क्रांतिकारी योगदान! आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण
यानंतर, पीएफआयची योजना न्यायपालिका, सैन्य आणि पोलिसांमध्ये आपल्या निष्ठावंत लोकांना ठेवून विरोधकांना संपवण्याची आणि शस्त्रास्त्रांचा साठा करून देशात इस्लामिक कायदा लागू करण्याची होती. एनआयएने सांगितले की, पीएफआयची एक विशेष रिपोर्टर विंग आणि सर्व्हिस विंग होती. रिपोर्टर विंग परिसरातील हिंदू नेत्यांची तपासणी करत असे आणि एक यादी तयार करत असे, ज्यामधून लक्ष्य निवडले जात असे आणि सर्व्हिस विंगद्वारे त्यांची हत्या केली जात असे. श्रीनिवासन यांची हत्या देखील या कटाचा एक भाग होती.
श्रीनिवासन यांची हत्या का झाली?
एनआयएच्या मते ही अचानक झालेली घटना नव्हती, तर एक सुनियोजित दहशतवादी हल्ला होता. श्रीनिवासन त्यांच्या निशाण्यावर असल्याने त्यांना ठार मारण्यात आले. पूर्ण तयारीनंतर, संधी मिळताच त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या वर्षी मार्चमध्ये ईडीने एसडीपीआय प्रमुख एमके फैजी यांनाही अटक केली होती, ज्यांना या संपूर्ण कटातील एक महत्त्वाचा दुवा मानले जाते. एकंदरीत, एनआयएने न्यायालयात सादर केलेल्या तथ्यांवरून असे दिसून येते की, पीएफआय एका गंभीर दहशतवादी कटात सहभागी होता. ज्याचा उद्देश केवळ एका व्यक्तीला मारणे नव्हे, तर संपूर्ण देशाची लोकशाही व्यवस्था नष्ट करणे होता.