पालकांकडून करिअर सल्ला घेणे थांबवा, ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमनने दिला IIT Delhi च्या विद्यार्थ्यांना सल्ला

OpenAI CEO Sam Altman  : ओपनएआयच्या सीईओ सॅम ऑल्टमन सध्या भारतीय सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांनी आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांना

OpenAI CEO Sam Altman 

OpenAI CEO Sam Altman 

OpenAI CEO Sam Altman  : ओपनएआयच्या सीईओ सॅम ऑल्टमन सध्या भारतीय सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांनी आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांना एक सल्ला दिला आहे. ज्यामुळे सध्या सोशल मीडियावर सॅम ऑल्टमन चर्चेत आले आहे. विद्यार्थ्यांशी बोलताना, एआयमुळे वेगाने बदल होत असलेल्या जगात करिअर सल्ल्याचे, विशेषतः पालकांकडून मिळालेल्या सल्ल्याचे आंधळेपणाने पालन करणे ही चूक ठरू शकते आणि आज तरुण लोक हेच करत आहे असं म्हटलं आहे. तसेच जर तुम्ही स्वत: अंदाज लावू शकत असाल भविष्यातील जग कसे असेल तर तुम्हाला माझ्यावर देखील विश्वास ठेवण्याची गरज नाही असं देखील  विद्यार्थ्यांशी चर्चा करताना सॅम ऑल्टमन म्हणाला.

विद्यार्थ्यांशी (IIT Delhi) पुढे बोलताना सॅम ऑल्टमन (OpenAI CEO Sam Altman) म्हणाला की, तरुणांना नेहमीच चांगले समजते. तुम्हाला मिळालेले जग खूप वेगळे असेल. तुम्हाला स्वतःचे अंदाज लावावे लागतील आणि त्यावर विश्वास ठेवावा लागेल. मला वाटते की, वृद्ध लोकांचे ऐकणे ही तरुणांची सर्वात मोठी चूक आहे. तुम्हाला स्वतःचे अंतर्ज्ञान लवकर विकसित करावे लागेल आणि त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. पारंपारिक करिअर सल्ले कदाचित तितकेसे काम करणार नाहीत. तसेच यावेळी सॅमने इशारा दिला की, भविष्यात एआय केवळ वैज्ञानिक प्रगती ऑटोमॅटिक करणार नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्था देखील ऑटोमॅटिक करणार आहे. एआय टूल्स आता व्यक्तींना असे काम कसे करण्यास परवानगी देतात ज्यासाठी एकेकाळी मोठ्या टीमची आवश्यकता होती. कल्पना आणि इच्छाशक्ती असलेली एक व्यक्ती अविश्वसनीय गोष्टी घडवू शकते असं तो म्हणाला.

2024 मध्ये भारत कसा असेल?

2024 मध्ये भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल तेव्हा कसा दिसेल असे विचारले असता सॅम म्हणाला की, येणारी पिढी अतिबुद्धिमान असेल. शिक्षणाचा चेहरा पूर्णपणे बदलेल. आरोग्यसेवेच्या क्षेत्रातही असेच घडेल. काम करण्याची पद्धतच बदलेल असं तो म्हणाला. तो म्हणाला की, प्रथम वर्षाचे विद्यार्थी पदवीधर होईपर्यंत त्यांना एआयपेक्षा चांगले तांत्रिक क्षेत्र सापडणार नाही. याचा अर्थ असा की भविष्य पूर्णपणे एआयभोवती फिरेल.

लोकांना हवे असलेले काहीतरी बनवा

आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी बोलताना सॅम म्हणाला की, गेल्या 20 वर्षांत कदाचित प्रत्येक गुंतवणूकदाराचे एकच ब्रीदवाक्य असेल: “लोकांना हवे असलेले काहीतरी बनवा.” ऑल्टमन यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, कदाचित त्यांना लोकांना काय हवे आहे हे चांगले समजेल. त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला की, साधनांसह पुढे राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी त्यांना पुढील काही महिन्यांत काय घडेल ते पाहत राहण्याचे आणि अंदाज घेण्याचे आवाहन केले.

झारखंडमध्ये मोठा विमान अपघात, रांचीहून दिल्लीला जाणारी एअर अँब्युलन्स कोसळली; 7 जाणांचा मृत्यू 

काही नोकऱ्या पूर्णपणे जाणार

नोकऱ्यांबद्दलच्या चिंता आणि मानवी कामगारांची जागा घेणारे एआयवर, सॅम म्हणाला की, पूर्णपणे आशावादी किंवा पूर्णपणे घाबरणे अवास्तव आहे. जो कोणी म्हणतो की, ते एआयबद्दल फक्त उत्साहित आहेत किंवा फक्त घाबरत आहेत तर तो फार विचारशील नाही. काही नोकऱ्या पूर्णपणे निघून जातील पण इतिहास सूचित करतो की नवीन भूमिका अपेक्षेपेक्षा वेगाने उदयास येतील. तुमच्यापैकी बरेच जण अखेर अशा नोकऱ्या करतील ज्या आज अस्तित्वात नाहीत असं त्याने विद्यार्थ्यांना सांगितले.

Exit mobile version